HW News Marathi
मुंबई

तारळी धरणाच्या व्हॉल्व्हच्या गळतीप्रकरणी दोषींवर कारवाई करणार…

धरणाच्या उर्वरित कामांना तातडीनं निधी उपलब्ध करुन देणार….

सातारा- तारळी धरणाच्या आत्तापर्यंत झालेल्या कामाचा व प्रलंबित कामाचा अहवाल मागवला आहे, त्यानंतर तातडीनं जलसंपदा मंत्री यांच्या बरोबर बैठक घेऊन तारळी धरणाच्या उर्वरित कामांना निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले.

सातारा सहपालकमंत्री सदाभाऊ यांनी आज तारळी धरणाला भेट देवून धरणाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.तारळी धरणाच्या पाणीद्वाराचा व्हॉल्व्ह शुक्रवारी फुटला होता, त्यामुळे धरणांतून 400 क्युसेक्स वेगाने पाणी वाहत होते, त्यामुळे पाली गावच्या नदी वाळवंटातील खंडोबाच्या यात्रा नियोजनावर पाणी फिरणार होते,त्यामुळे या घटनेचं गांभीर्य मोठं होतं. मात्र जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्यासह प्रशासनानं तातडीनं एका दिवसात उपाययोजना करुन व्हॉल्व्हची दुरुस्ती करत संभाव्य धोका टाळला, याबाबतही सदाभाऊ यांनी प्रशासनाच्या समयसूचकतेचं कौतुक केलं.

पाटबंधारे विभागाने व्हॉल्व्हमधून होणारी मोठी गळती थांबवून चांगले काम केले आहे. मी जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे विशेष कौतुक करतो, असं सदाभाऊ यांनी सांगितलं.

धरणामधून विविध भागातून गळती सुरु आहे ही गळती थांबविण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे. ठेकेदाराचे 14 कोटींचे देयक थांबविण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. क्षेत्र पालच्या खंडोबाची यात्रा निर्विघ्नपणे पार पाडण्याच्या सूचनाही सहपालकमांत्री सदाभाऊंनी दिल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील फोर्ट परिसरातील इमारतीचा भाग कोसळला!

News Desk

देवदत्त धनोकर यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

News Desk

आरपीएफ जवानाने वाचविले प्रवाशाचे प्राण

News Desk