HW News Marathi
मुंबई

राज्यातल्या विद्यापीठ उपकेंद्राचा प्रश्न न सुटल्यास विधानभवनावर मोर्चा- संग्राम कोते पाटील

उपकेंद्रांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सात मोर्चे, हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या विद्यापीठ उपकेंद्रा प्रश्न न सुटल्यास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात मुंबई विधानभवनावर हजारों विद्यार्थ्यांचा मोर्चा काढणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी दिला आहे.

राज्यात साधारणपणे चार ते पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र हे अनेक विद्यापीठांचे आहे. त्यामुळे विद्यापीठाचे मुख्य केंद्र असलेला जिल्हा वगळता बाकी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अनेक कामासाठी शेकडो किमीचे अंतर कापून थेट विद्यापीठ गाठावे लागते. एकाच कामासाठी विद्यार्थ्यांना अनेकवेळा विद्यापीठात हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे होणारे आर्थिक व शैक्षणिक नुकसान हे विद्यार्थ्यांना न परवडणारे आहे. याच कारणाने विद्यार्थ्याकडून प्रत्येक जिल्हापातळी विद्यापीठ उपकेंद्राची मागणी पुढे येत आहे. याच मागणीला अनुसरुन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने २० डिसेंबर ते १० जानेवारीच्या कालावधी मध्ये राज्यभरात सात मोर्चे काढले त्याला विद्यार्थ्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. येत्या काळात विद्यापीठांचे उपकेंद्रासाठी सरकारकडून लवकरात-लवकर हालचाली न झाल्यास मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात विधानभवनावर हजारो विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्याचा इशारा संग्राम कोते-पाटील यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शांतता क्षेत्रात ध्वनीक्षेपक लावण्यास बंदी

News Desk

भाजपा 60 जागांवर नाखूष – शेलार

News Desk

बेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस मान्यता

News Desk