HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाची तातडीची बैठक

नवी दिल्ली | भारतीय वायू दलाकडून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी इस्लामाबादमध्ये तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. भारतीय वायू दलाच्या ‘मिराज २०००’ या १२ लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषा पार करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये (एलओसी) असणाऱ्या दहशवाद्यांच्या तळावर तब्बल १००० किलो बॉम्ब टाकले असल्याची अत्यंत महत्त्वाचे वृत्त एएननाय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

अद्याप भारत सरकारकडून याला कोणत्याही प्रकारचा अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. भारतीय वायू दलाच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची देखील तातडीची बैठक झाली आहे.

प्राथमिक अंदाजानुसार या भारताने केलेल्या या हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या ‘बालाकोट’ या दहशतवादी तळातील २०० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाला असल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून मिळत आहे. पाकिस्तानकडून मात्र हे सर्व अमान्य केले जात असून भारतीय हवाई दलाच्या विमानाने नियंत्रण रेषा ओलांडली मात्र आम्ही त्यांना थारा दिला नाही, असा बनावटी दावा केला जात आहे.

“भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीमध्ये घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे”, असा आरोप पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करून केला आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या विमानांनी भारताच्या विमानांना थारा दिला नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसभेसाठी भाजपकडून पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांच्या नावांची घोषणा

Aprna

रमजानमध्ये दहशतवाद्यांविरोधी कारवाया थांबवा, मुफ्तींची मागणी

News Desk

जम्मू-काश्मीर हल्ला

News Desk