HW News Marathi
देश / विदेश

…तर पाकिस्तानला ओसाड बनवू, नितीन गडकरींचा इशारा

नवी दिल्ली | “भारतातून वाहणाऱ्या तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला जाते. हे पाणी यमुना नदीला जोडून पाकिस्तानला ओसाड बनवू” , असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशमधील बागपत येथे झालेल्या एका सभेत नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला हा इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात १४ फेब्रुवारीला सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

“भारतातील माध्यमे, राजकारणी लोक पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा आरोप आमच्यावर करीत आहेत. मात्र, कोणत्याही पुराव्यांअभावी, न्यायव्यवस्थेच्या वर जाऊन तुम्ही आमच्यावर हे आरोप कसे काय करू शकता ? भारताने जर आमच्यावर हल्ला करण्याचा विचार केला तर आम्ही विचारही करणार नाही. आम्ही थेट प्रत्युत्तरच देऊ”, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले होते.

“भारताने शांततेची बोलणी केली तर आम्ही देखील करू. मात्र जर भारताने युद्धाची भाषा केली, तर आम्ही देखील आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. मग ना कधी गवत उगवेल, ना कधी चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येईल आणि ना कधी मंदिरात घंटानाद होईल”, अशी धमकी पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास शांततेवर चर्चा होऊ शकते | इम्रान खान

News Desk

महात्मा गांधी आणि त्यांचे विचार अमर आहेत, त्या विचारांवर चालण्यासाठी दृढसंकल्प करुया! – अजित पवार

Aprna

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदक

News Desk