HW News Marathi
राजकारण

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये २ जागांवरून वाद

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर बुधवारी (१३ फेब्रुवारी) काँग्रेस-राष्ट्रवादी पार पडलेल्या बैठकीत पेच निर्माण झाला आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये एकत्र येत आहे. परंतु या बैठकीत मात्र आघाडीत दोन जागांवरून तिढा निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यासाठी अहमदनगरची जागा सोडण्यास राष्ट्रवादीने नकार दिला आहे. त्यामुळे अमरावतीवरून आघाडीत पेच पडला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या तीन लोकसभा निडणुकीत अमरावतीतून आलेले अपयश मिळाले होते. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीला अमरावती मतदार संघ सोडण्याचा प्रस्ताव बैठकीत ठेवला होता. काँग्रेसने राष्ट्रवादीला अमरावती व्यतिरिक्त औरंगाबादचा पर्याय देण्याची तयारी दाखविली होती. विखे-पाटील यांनी मात्र पुत्रासाठी याच मतदारसंघाचा हट्ट धरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच राष्ट्रवादीकडून अमरावती लोकसभा मतदार संघ लढविण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. काँग्रेसने अमरावती ऐवजी औरंगाबाद आणि बुलढाण्यातून निवडणूक लढवावी असे दोन नवे प्रस्ताव राष्ट्रवादीला दिले आहेत.

आघाडीच्या जागावाटपाबाबत बुधवारी रात्री विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार काँग्रेसकडून तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शाहिद आफ्रिदीचे ‘चांदतारे’, सामनामधून ठाकरेंनी घेतला समाचार

News Desk

भाजपने धनगर समाजाला सर्वाधिक न्याय दिला | चंद्रकांत पाटील

News Desk

चंद्राबाबू उगाच स्वतःची दमछाक का करून घेत आहेत ?

News Desk