HW News Marathi
मुंबई

तारापोरवाला मत्स्यालयातील आजारी कासवाचे मुंबईकरांना दर्शन

मुंबई । मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या तारापोरवाला मत्स्यालयातील ‘तारा’ या ‘ग्रीन सी’ प्रजातीच्या मादी समुद्री कासवाचे मत्स्यालयात पुनरागमन झाले आहे. हे कासव गंभीर आजाराने ग्रासलेले होते. ‘तारा’वर पशुवैद्यकांनी यशस्वी उपचार केल्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून मत्स्यालय प्रशासनाकडून तिची देखभाल सुरू होती. आता ‘तारा’ची प्रकृती सुधारल्याने तिला पुन्हा प्रदर्शन टाकीत सोडण्यात आले आहे. तारापोरवाला मत्स्यालयात मे महिन्यात दोन सागरी कासवांचा मृत्यू झाला होता. तर ग्रीन सी प्रजातीची मादी कासव गंभीर आजारी होते. तिला कासवतज्ज्ञ पशुवैद्यक डॉ. दिनेश विन्हेरकर यांनी डहाणू येथील सागरी कासव शुश्रुषा केंद्रात उपचारासाठी हलविले.

तारापोरवाला मत्स्यालयातूून आल्याने केंद्रातील स्वयंसेवकांनी या मादी कासवाचे नामकरण ‘तारा’ असे केले. पोटाचा संसर्ग झाल्याने ‘तारा’ला अन्नग्रहण करण्यास त्रास होत होता. जुलै महिन्यात तिची रवानगी पुन्हा मत्स्यालयात करण्यात आली, मात्र ती स्वत: खाद्य ग्रहण करत नसल्याने तिला भरवले जात होते. शिवाय खोल पाण्यात पोहण्यात अडचणी निर्माण होत असल्याने उथळ पाण्यात ठेवून तिच्यावर देखरेख करण्यात येत होती, अशी माहिती साहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी निखिल नागोठकर यांनी दिली. मात्र काही दिवसांनी टाकीतील पाण्याची उंची क्रमाक्रमाने वाढवत ताराला स्वत: खाद्य ग्रहण करण्यासाठी उद्युक्त करण्यात आले. त्यानंतर ती स्वत:हून बोंबील, मांदेलीसारखे मासे ग्रहण करू लागल्याने पर्यटकांच्या दर्शनासाठी तिची रवानगी पुन्हा प्रदर्शन टाकीत केल्याचे नागोठकर यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

धारावी पुनर्विकास प्रकल्पात आता राज्य सरकारचा सहभाग

Gauri Tilekar

मेट्रो-३ मार्गिकेचे नयानगर-दादरपर्यंतचे भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण

News Desk

मुंबईत जमावाकडून पोलिसांना मारहाण

News Desk
राजकारण

चंद्रशेखर आझाद यांची सुटका करा | अविनाश महातेकर

News Desk

मुंबई | भीम आर्मी या सामाजिक संघटनेचे प्रमुख ऍड चंद्रशेखर रावण हे चैत्यभूमी येथे जात असताना त्यांना करण्यात आलेली अटक अत्यंत चुकीची असून त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर यांनी केली आहे.

येत्या 1 जानेवारीच्या भीमा कोरेगाव शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येणारी खबरदारी आणि उपाययोजनांना आमचा विरोध नाही. खबरदारी म्हणून पोलिसांकडून होणाऱ्या उपाययोजना योग्य असून भीम आर्मी च्या प्रमुखांना अटक करण्याची कृती चुकीची निषेधार्हच असल्याची रिपब्लिकन पक्षाची भूमिका पक्षप्रवक्ते अविनाश महातेकर यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केली आहे.

Related posts

काँग्रेसच्या महासिचवांच्या बैठकीत प्रियांका गांधींची उपस्थिती

News Desk

एकाकी लढून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही

News Desk

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला मोदींच्या कार्याचा गवगवा

News Desk