HW News Marathi
मुंबई

नाताळच्या निमित्ताने किर्ती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

मुंबई | मुंबईतील अनेक महाविद्यालयांमध्ये सध्या कॉलेज फेस्टिव्हल्समुळे उत्साहाचे वातावरण असताना कीर्ती कॉलेजच्या एन.एस.एस युनिटच्या विद्यार्थ्यांनी राबविलेला उपक्रम हा सर्वांचेच लक्ष वेधत आहे. किर्ती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी २४ डिसेंबरला रात्री बारा वाजता रस्त्यावर झोपलेल्या मुलांजवळ जाऊन चॉकलेट्स आणि भेटवस्तू ठेवल्या.

कीर्ती महाविद्यालयाच्या या विद्यार्थ्यांनी सांताक्लॉज बनून या मुलांना २४ डिसेंबरच्या रात्री भेटवस्तू आणि चॉकलेट्स दिली. त्या लहान मुलांसाठी या भेटवस्तू म्हणजे एक सुखद धक्काच होता. कीर्ती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘#स्प्रेडदहॅप्पीनेस’ या उपक्रमाच्या माध्यमातून हटके पद्धतीने ख्रिसमस सेलिब्रेशन केले असल्याचे गौरव धावडे याने सांगितले.

या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दादर, माटुंगा, माहीम या संपूर्ण परिसरात फिरुन ‘सिक्रेट सांता मिशन’ पूर्ण केले. लहान मुलांसाठी शैक्षणिक साहित्यासह अन्नपदार्थ, ऊबदार शाली, कपडे, जॅकेट्स अशा भेटवस्तू आणल्या होत्या. तरुणाई म्हणजे सेलिब्रेशन, खरेदी, पार्ट्या या गोष्टींचीच चर्चा होते. पण या विद्यार्थ्यांनी आपल्या अनोख्या उपक्रमासह तरुणाईसमोर वेगळाच आदर्श ठेवला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी बेस्ट कामगार संपावर

News Desk

ठाण्यातील कोपरीमध्ये डेकोरेशनच्या गोदामाला भीषण आग

News Desk

पारसी जनरल रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांना न्याय मिळवून देऊ, विजय कांबळेंची ग्वाही

swarit
महाराष्ट्र

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा शुभारंभ

News Desk

मुंबई | आता महाराष्ट्रातील शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यातील शाळांची निवड करण्यात आली आहे. त्या शाळांमध्ये आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मंगळवारी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुंबईमध्ये झालेल्या कार्यक्रमात या १३ शाळांची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हे उपस्थित होते. निवड करण्यात आलेल्या या १३ शाळांना ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा’ असे संबोधण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अटलजींनी नेहमीच विविध क्षेत्रात सर्व पध्दतीने विकास करुन देशाला दिशा दिली, देशाच्या विकासाचा दर वाढविला. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतीयांना भारतातच आंतरराष्ट्रीय शिक्षण देण्याच्या या उपक्रमाचा शुभारंभ म्हणजेच अटलजींना खऱ्या अर्थाने ही श्रध्दांजली आहे.

राज्यातील मुलांना त्यांच्या मातृभाषेतूनच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, त्याचप्रमाणे त्यांना जगातल्या विविध भागाचे ज्ञान व्हावे या उद्देशाने राज्य शासनाकडून महाराष्ट्रातील १०० शाळांना आंतरराष्ट्रीय शाळांचा दर्जा देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पुणे, सातारा, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नंदुरबार, परभणी, चंद्रपूर, गोंदिया, बुलढाणा, वाशिम या १३ जिल्ह्यातील शाळांची निवड करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

या शाळांच्या निवडीसाठी विविध प्रकारचे निकष ठरविण्यात आले आहेत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय शाळांसाठी घटकांचा पुढाकार, शाळेतील विद्यार्थी पटसंख्या, मूलभूत पायाभूत सुविधा ज्यामध्ये शाळेची प्रवेश क्षमता, इंटरनेट सुविधा, स्वच्छ परिसर, तंत्रज्ञानाच्या वापरासाठीच्या सुविधा, विद्यार्थ्यांची वाहतूक सुविधा अशा अनेक निकषांच्या आधारे या शाळांची निवड करण्यात आली आहे.

Related posts

आजपासून राज्यातील नाट्यगृह खुली; अजित पवार म्हणाले, “किती वेळा वाजवायची…”

News Desk

मीरा NX हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थेटर प्रमुख महिला कर्मचारीचा संशयस्पद मृत्यू

News Desk

राज्यातील एकही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही! – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

Aprna