HW News Marathi
राजकारण

रथयात्रेच्या परवानगीसाठी आता भाजप सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली | पश्चिम बंगालमधील भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रथयात्रेला कोलकाता उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाकडून परवानगी नाकारण्यात आल्यानंतर भाजपने याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्याचप्रमाणे याबाबत तात्काळ सुनावणी करण्यात यावी अशी मागणी देखील भाजपने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाने २० डिसेंबर रोजी अमित शहा यांच्या पश्चिम बंगालमधील रथयात्रेला परवानगी दिली होती. परंतु, २१ डिसेंबर रोजी मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठाने ही परवानगी रद्द केली होती. दरम्यान, आता भाजपकडून कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने दिली आहे.

अमित शहा यांच्या रथयात्रेचे नाव ‘लोकशाही बचाव यात्रा’ असे असून ही रथयात्रा ४० दिवस पश्चिम बंगालमधील सर्व लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये जाणार होती. पश्चिम बंगालमधील तीन ठिकाणांहून २२,२४ आणि २६ डिसेंबरला ही रथयात्रा निघणार होती. या रथयात्रेसाठी भाजपने जय्यत तयारी देखील केली होती, अशी माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवसेनेने उत्तर प्रदेशासाठी जाहीर केली ५ उमेदवारांची यादी

News Desk

कश्मीरात जो हिंसाचार, दहशतवाद आणि फुटीरतावाद बोकाळला आहे त्यास एकटा सिद्धू जबाबदार नाही | ठाकरे

News Desk

मी तुम्हाला ‘चौकीदार’ची टोपी आणि शिटी देतो !

News Desk
महाराष्ट्र

बीड ऑनरकिलिंग प्रकरणात कट रचणारा पोलिसांच्या अटकेत

News Desk

बीड | बहिणीबरोबर प्रेम विवाह केल्यामुळे सख्या मेहुण्याचा धारदार शस्त्राने खून केल्याची ऑनरकिलिंगची घटना बीडमध्ये (१९ डिसेंबर) घडली होती. या प्रकरणात खुनाचा कट रचण्यात सहभागी असलेल्या कृष्णा क्षीरसागर याला बीड पोलिसांनी अटक केले असून सोमवारी (२४ डिसेंबर) न्यायालयात हजर केले जाणार आहे. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी बालाजी लांडगे आणि संकेत वाघ हे दोघे अद्याप फरार आहेत.

बीड येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आसताना सुमित वाघमारे आणि भाग्यश्री लांडगे यांचे प्रेम सबंध जुळले. घरच्यांचा लग्नाला विरोध असतानाही दोन महिन्यांपूर्वी पळून जावून लग्न केले होते. दरम्यान १९ डिसेंबर रोजी भाग्यश्री आणि सुमित परीक्षा देण्यासाठी आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज येथे आले होते. यावेळी भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगे व संकेत वाघ या दोघांनी सुमित वाघमारे याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या सुमितचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली होती.

या प्रकरणातील मुख्य आरोपी बालाजी लांडगे आणि संकेत वाघमारे पोलिसांना सापडलेले नाहीत. आरोपी सापडत नसल्याने पोलिसांवर सर्व स्तारातून टीका होत असताना सोमवार सकाळी ऑनरकिलिंग प्रकरणाच्या कटात सहभाग असलेल्या कृष्णा क्षीरसागर याला पोलिसांनी अटक केली. कृष्णाला बेड्या ठोकल्याने मुख्य आरोपींपर्यंत पोलिसांना पोहचण्यास मदत होणार आहे. यामुळे तपासालाही गती आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Related posts

‘टॉनिक’च संपल्यामुळे बाळसे म्हणून दिसणारी सूज उतरली, सामनातून भाजपवर टीका

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील एखादं आसन सुचवा, अतुल भातकळकरांचा टोला

News Desk

“कोशीश करने वालों की कभी हार नही होती,” अँजिओप्लास्टीनंतर राऊतांचे ट्विट

News Desk