HW News Marathi
राजकारण

छिंदमच्या विजयाला आव्हान देणारी याचिका दाखल

अहमदनगर | छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून संपूर्ण राज्याचा रोष ओढवून घेणाऱ्या श्रीपाद छिंदम हा अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ९ मधून २००० पेक्षा जास्त मतांसह विजयी झाला. परंतु, याबाबत आता आक्षेप घेण्यात आला आहे. छिंदमच्या विजयालाच आव्हान देणारी याचिका निलेश म्हसे यांनी याबाबत जिल्हा न्यायालयात दाखल केली आहे. निलेश म्हसे हे या निवडणुकीत छिंदमच्या विरोधात उभे राहिले होते. छिंदमची झालेली निवड रद्द ठरवावी, अशी मागणी देखील या याचिकेमार्फत करण्यात आली आहे. दरम्यान, या याचिकेमुळे छिंदमच्या अडचणीत वाढ होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत छिंदमने अपशब्द काढल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून त्याच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर संतप्त टीका झाली होती. त्यामुळेच छिंदमला भाजपमधून बाहेरची वाट दाखविण्यात आली होती. त्यानंतर त्याने अपक्ष म्हणून ही निवडणूक लढविली. धक्कादायक म्हणजे छिंदमवर यावेळी गुन्हा दाखल असून तो तडीपार होता तरीही, या निवडणुकीत जनमत छिंदमच्याच बाजूनेच झुकले. मात्र, आता छिंदमच्या विजयला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आल्याने छिंदमच्या अडचणीत वाढ झाली आहे. महापलिका निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर छिंदम मंगळवारी नगरमध्ये दाखल झाला. त्याने आपल्या कार्यालयात शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी राजकीय पक्षांची चढाओढ

News Desk

योगी आदित्यनाथसह मायावती यांच्यावर प्रचारबंदी, निवडणूक आयोगाचा दणका

News Desk

‘गद्दारी’ करणारे पक्ष सोडून गेल्यामुळे काँग्रेसकडून ‘लाडू वाटप’

News Desk
देश / विदेश

अॅम्बी व्हॅलीवर बोली लावण्यास सुरुवा

News Desk

मुंबई : गुंतवणूदारांचे पैसे बुडविल्याप्रकरणी अनेक महिने तुरुंगात डांबण्यात आलेले सहारा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सुब्रातो रॉय यांना जोरदार हादरा बसला आहे. कारण त्यांच्या लोणावळा येथील अॅम्बी व्हॅलीचा लिलाव सुरू करण्यात आला आहे. ६७ हजार ६२१ एकरवरीलया संपूर्ण मालमत्तेची किंमत तब्बल ३४ हजार कोटी असून तसेच लिलावाची बोली ३७, ३९२ कोटीपासून सुरू झाली आहे.

मुंबई उच्च न्यायलयाने आजच अॅम्बी व्हॅलीसाठी लिलावाची नोटीस प्रसिद्ध केली. लिलावाला स्थगिती मागणारी याचिकागुरुवारी फेटाळून लावण्यात आली होती. दरम्यान, मॉरिशसमधील रॉयल पार्टनर्स इन्वेस्टमेंट फंड या कंपनीने अॅम्बी व्हॅलीमध्ये १० हजार ७०० कोटी रुपये गुंतवण्याची तयारी दर्शवली होती. तर सहारा समुहाच्या मते अॅम्बी व्हॅलीचे बाजारमूल्य १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आता अॅम्बी व्हॅलीच्या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related posts

पराभवानंतर राहुल गांधींनी अमेठीला दिली पहिल्यांदा भेट

News Desk

Raksha Bandhan Special |पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या रक्षाबंधनच्या शुभेच्छा…

News Desk

JNU मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरून वाद; काय आहे नेमके प्रकरण

Aprna