HW News Marathi
देश / विदेश

सर्जिकल स्ट्राइकचा मोठ्या प्रमाणावर गवगवा करण्यात आला !

नवी दिल्ली | सर्जिकल स्ट्राइकचा मोठ्या प्रमाणावर गवगवा करण्यात आला, असे मत लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) डी.एस. हुड्डा यांनी व्यक्त केले आहे. सर्जिकल स्ट्राईकबाबत करण्यात आलेल्या अती प्रचाराविषयी हुड्डा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सैन्याच्या कोणत्याही मोहिमेचे असे राजकारण करणे योग्य नाही, असेही पुढे हुड्डा यांनी म्हटले आहे. ‘रोल ऑफ क्रॉस-बॉर्डर ऑपरेशन्स अँड सर्जिकल स्ट्राइक’ या विषयावर हुड्डा बोलत होते.

भारतीय लष्कराने २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तानने व्यापलेल्या काश्मीरमध्ये आतंकवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राइक केले होते. या कारवाईच्या वेळेस डी.एस.हुड्डा उत्तरी सैन्य विभागाचे कमांडर होते. आतंकवाद्यांचे अनेक मनसुबे मोडीत काढण्याचे या सर्जिकल स्ट्राइकचे उद्दिष्ट्य होते.

तसेच हुड्डा पुढे म्हणाले कि, “मी सैन्याच्या दृष्टिकोनातून या प्रकरणाकडे पाहतो. सर्जिकल स्ट्राईक महत्त्वाचा होता. उरीमध्ये आमचे अनेक जवान मारले गेले होते. त्यामुळे पाकिस्तानला समज देणे आवश्यकच होते. परंतु, याचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला ज्याची आवश्यकता नव्हती. त्याचप्रमाणे या प्रकरणाला राजकीय रंग देण्यात आला.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“बेळगावमध्ये शिवरायांचा पुतळा काँग्रेस नेत्याने हटवलाय, शिवसेना राजीनामा देणार का ?”

News Desk

बायडन आणि हॅरिस यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक – नरेंद्र मोदी

News Desk

उत्तर भारतातील महापुरामुळे जनजीवन विस्कळीत

News Desk
महाराष्ट्र

यंदा मॉन्सून वेळेत दाखल होणार

swarit

मुंबई : हवामान खात्यांच्या अंदाजानुसार मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मान्सून मुंबईत दाखल झाल्यानंतर दोन-तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून हजेरी लावेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने यंदा सध्याची परिस्थिती, समुद्राचे तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले आहे. तर महाराष्ट्रात उत्तम पाऊस होईल, असे स्कायमेटने नमूद केले आहे.

Related posts

दरड सत्र सुरूच, रायगडमधील हिरकणी वाडीत दरड कोसळली..!

News Desk

अयोध्येला गेल्यावर गेल्यानंतर राज ठाकरेंना काही मदत लागली तर नक्कीच आम्ही मदत करु – संजय राऊत

News Desk

जामीनासाठी नवाब मलिकांच्या मुलाकडे मागितली 3 कोटीची लाच

Aprna