HW News Marathi
राजकारण

नाशिकच्या हिरे कुटुंबियांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

मुंबई । नाशिकमधील माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे आणि अद्वैत हिरे यांच्यासह त्यांच्या हजारो समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या जाहीर प्रवेशासाठी आज राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार पक्ष कार्यालयात आले होते. यावेळी शरद पवार यांनी हिरे कुटुंबियांचे पक्षात स्वागत केले. शिवाय नाशिक तसेच नाशिकच्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे कौतुकही केले. भाऊसाहेब हिरे यांच्या नाशिकसाठी असलेल्या योगदानाबाबतही त्यांनी भाष्य केले. फळबागायतीमध्ये क्रांती केलेला हा नाशिक जिल्हा असल्याचे गौरवोदगारही यावेळी शरद पवार यांनी काढले.

“हिरे कुटंबियांची विचारधारा चांगली आहे. ते दुसऱ्या पक्षात गेले तो अपघात होता. त्या अपघातातून सावरुन त्यांनी त्यांची गाडी योग्य वळणावर आणली आहे. भुजबळांना बळ देण्यासाठी हे दोन तरुण आता उभे ठाकले असून आता सगळ्या क्षेत्रात नाशिकचा नावलौकिक वाढवण्यासाठी सर्वांनीच कामाला लागा आमची साथ कायम राहील”, असे आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिले. नाशिककरांनी नेहमीच शरद पवार यांच्या विचारांना साथ दिली आहे. नाशिककरांच्या कोणत्याही समस्यांची जाण सरकारला नाही. परंतु शरद पवार हे नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत”, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

माजी मंत्री प्रशांत हिरे,माजी आमदार अपूर्व हिरे आणि अद्वैत हिरे यांचे पक्षात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वागत केले. या पक्ष प्रवेशामुळे नाशिकसह दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढणार आहे. यामुळे छगन भुजबळ यांना आणखी ताकदीने काम करता येणार असल्याचा विश्वासही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.”हिरे कुटुंबियांशी काही काळ दुरावा निर्माण झाला होता. परंतु आता कोणताही दुरावा नाही. त्यांना नाशिकच्या राजकारणामध्ये मानाचे स्थान दिले जाईल”,असेही आमदार छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सरन्यायाधीशांचे तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर सवाल

Aprna

पंतप्रधान मोदींनी नाकारले सार्क संमेलनाचे निमंत्रण

News Desk

“बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!”, न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदेंचे ट्वीट

Aprna
राजकारण

काँग्रेसने शेतकऱ्यांना बरबाद केले, पंतप्रधान मोदींची जहरी टीका

News Desk

लखनऊ | पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (२९ डिसेंबर) उत्तर प्रदेशच्या गाजीपूर आणि वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी वाराणसीच्या आधी गाजीपूरचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी महाराजा सुहेलदेवचे डाक तिकीट जारी केले. यावेळी आरटीआय मैदानावर लोकांना संबोधित करीत असताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या कर्जमाफीच्या वचनावर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले कि, “कर्नाटकमध्ये काँग्रेसने कर्जमाफीची घोषणा करून लोकांची मते चोरली आणि सत्ता स्थापन झाल्यानंतर केवळ ८०० शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. हा कोणता खेळ आहे, हा कोणता विश्वासघात आहे. काँग्रेसने शेतकऱ्यांना बरबाद केले. त्यांनी स्वामिनाथन आयोगाची शिफारस लागू केली नाही. आमच्या सरकारने ही शिफारस लागू केली.”

“गाजीपूरमध्ये नवे मेडिकल कॉलेज, गोरखपूरमध्ये एआयआयएमएस, वाराणसीमध्ये आधुनिक रुग्णालय, जुन्या रुग्णालयाचा विस्तार असो ही सर्व कामे आता लवकरात लवकर पूर्ण होतील. आज देशातील गरिबातील गरीब व्यक्तीसाठी आपल्या समस्या सरकारपुढे मांडण्याचा मार्ग खुला आहे. त्याचप्रमाणे त्यांना सन्मानाचे जीवन देण्यासाठीच्या अभियानाची ही सुरुवात आहे,” असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. “येणारी वेळ ही तुमची आहे, तुमच्या मुलांची आहे. तुमचे भविष्य सुधारण्यासाठी तुमचा चौकीदार खूप प्रामाणिकपणे, खूप कष्ट करून दिवसरात्र एक करीत आहे”, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Related posts

मी माझ्या घरातील मुलांचे बालहट्ट पुरवणार, दुसऱ्यांचे कशाला!

News Desk

Raj Thackeray ED Live Updates : साडेआठ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे बाहेर

News Desk

रामाचा वनवास 2019 पूर्वी संपवा !

News Desk