HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदी नेमके कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत ?, राहुल गांधींचा सवाल

नवी दिल्ली | “भगवद गीतेत काय म्हटले आहे हे सर्वांनाच माहीत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू असले तरी त्यांना हिंदुत्वाबद्दल काहीही माहीत नाही. ते नेमके कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत ?”, असा प्रश्न काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. उदयपूर येथील एका कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते.

यावेळी राहुल गांधी यांनी सर्जिकल स्ट्राइक आणि नोटबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली. “पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी मंत्रिमंडळाला एका खोलीत बंद करून त्यानंतर त्यांनी हा नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले असून या निर्णयामुळे दोन लाख लोक उद्ध्वस्त झाले”, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

“सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय हा सैन्याचा निर्णय होता. मात्र, पंतप्रधान मोदींनी याचे श्रेय स्वतः घेऊन राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला”, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. “मनमोहन सिंग सरकारच्या काळात जेव्हा सर्जिकल स्ट्राइक झाले होते तेव्हा मनमोहन सिंग यांना सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सर्जिकल स्ट्राइकबाबत गोपनीयता बाळगण्याची विनंती केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र थेट सैन्याच्या डोमेनमध्येच प्रवेश केला”, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारचा समाचार

News Desk

चंद्रकांत पाटलांचा उदयनराजेंना टोला, म्हणाले मैदानात जाऊन धिंगाणा घाला

News Desk

तासगावात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा जोरदार मोर्चा, नाराज गटाने मोर्चाकडे फिरवली पाठ ?

News Desk
क्राइम

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या पोलिसाला बेड्या

News Desk

अकोला : शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तब्बल वर्षभर बलात्कार करणाऱ्या पोलिसावर जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्यासंदीप आनंद गवई या ४२ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यानेसंबंधित १५ वर्षीय मुलीवर ऑक्टोबर २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत बलात्कार केले. रविवारी पीडितेने याची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात केल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली.

संदीप गवई याने २०१६ च्या दसऱ्याच्या दिवशीतिला घरी बोलावले व मोबाइल नंबर दिला. ‘मला नेहमी फोन करीत राहा. तू फोन केला नाहीस, तर तुझ्या आईला व भावाला मारून टाकीन,’ अशी धमकीही दिली. तेव्हापासून तो सतत बोलत असे. दिवाळीनंतर आई मामाच्या घरी गेल्यानंतर त्याने घरी कुणी नसल्याचे पाहूनतिला बोलावले व बलात्कार केला. त्यानंतर जानेवारी महिन्यात पुन्हा त्याने बलात्कार केला. मी शाळेत जायचे,तेव्हा आरोपी पाठलाग करायचा व जवळीक करण्याचा प्रयत्न करायचा; मात्र त्याला सतत टाळण्याचा प्रयत्न करायचे, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, ४ जुलैच्या रात्री आरोपीने आई घरी असताना हाका मारल्या. आईने विचारणा केली असता, मी आजपर्यंतचा घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर आम्ही पोलीस ठाणे गाठले असेही पीडितेने म्हटले आहे.

Related posts

पॉर्न फिल्ममुळे विमान प्रवाश्याला अटक

News Desk

माहूरमध्ये ३ लाख ९८ हजाराच्या मुद्देमालासह ७ जणांना अटक

News Desk

सलमान खाननी ‘या’ कारणासाठी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

Aprna