HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

सांगली | मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषद २०१८चे गुणिजन गौरव पुरस्कार सोहळा नुकताच दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र ,मुंबई महाराष्ट्र राज्य येथे संपन्न झाला.

जत तालुक्यातील पांडोझरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बाबरवस्तीचे मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार यावेळी देण्यात आला. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती.

वाघमारे यांनी शाळेत विविध उपक्रम राबविले आहेत.शाळेत वृक्षलागवड,स्वच्छता ,शैक्षणिक उठाव,दुष्काळी परिस्थितीतही शाळा परिसर हिरवागार करण्याबरोबर सुट्टीच्या कालावधीतही पालक विद्यार्थी सोबत घेवून वृक्षसंगोपन साठी व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत.अनेक मासिकेत व विशेषांक व वृत्तांत लेख व कविता प्रकाशित झाले आहेत.

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्यावतीने राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार देण्यात आला.या पुरस्काराचे वितरण कृष्णाजी जगदाळे व प्रकाश सावंत ,के.एल.गोगावले , यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमोल सुपेकर,रमाकांत सोनकांबळे व राज्यातील सर्व तसेच जिल्ह्यातील गुणिजन उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद कायम ?

News Desk

होम क्वॉरंटाइन असलेल्यांनो घराबाहेर पडू नका, तुमच्यावर २४० होमगार्डची करडी नजर

News Desk

शिवसेना आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

News Desk
महाराष्ट्र

सेंच्युरी रेयॉनमध्ये विषारी गॅस गळती, कामगाराचा गुदमरुन मृत्यू, ११ जण गंभीर

swarit

उल्हासनगर विषारी गॅसच्या गळतीमुळे एका हंगामी कामगाराचा गुदमरुन मृत्यू झाला. तर विषारी गॅस नाका-तोंडात गेल्याने ११ कामगारांना गंभीर अवस्थेत कल्याणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना उल्हासनगर-शहाड परिसरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत घडली असून संजय शर्मा (३४) असे गुदमरुन मृत्यू झालेल्या हंगामी कामगाराचे नाव आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर १ येथील शहाड परिसरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत रात्री ९ वाजताच्या सुमाराला गॅसच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्याच सुमाराला एका गॅसच्या पाईपलाईनमधून विषारी गॅसची अचानक गळती सुरू झाली. यावेळी कुठल्याही प्रकारची कंपनीच्या वतीने कामगारांना सुरक्षा पुरविण्यात आली नसल्याचा आरोप कामगार व त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे हंगामी कामगार संजय शर्मा यांचा गुदमरुन जागीच मृत्यू झाला असून ११ कामगारांना कल्याणच्या एका खासगी रुग्णालयात गंभीर अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान यापूर्वीही अनेक कामगारांनी विषारी गॅस गळतीमुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र या कंपनीत आजही हंगामी कामगारांना राबवून त्यांच्या सुरक्षेतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे आजच्या घटनेवरुन समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच गॅस गळती रोखणाऱ्या पथकासह अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र संजय शर्मा या हंगामी कामगाराचा गुदमरुन मृत्यू झाल्याने कंपनीच्या आवारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर कंपनीच्या ठेकेदाराच्या माहितीनुसार त्याला चार दिवसाचे काम एका दिवसात पूर्ण करण्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ही घटना घडल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

Related posts

फोन टॅपिंगचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर, अनेकांचे बिंग फुटणार – देवेंद्र फडणवीस

News Desk

संजय राऊतांनी पुराव्यानिशी केली नारायण राणेंची बोलती बंद, म्हणाले…

News Desk

रुग्णालयातून डिस्जार्च मिळाल्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा कामावर रुजू

Aprna