HW News Marathi
राजकारण

#MarathaReservation : ट्विटरवर मराठा आरक्षण ट्रेंडिंग

मुंबई | विधिमंडळात आज मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. यानंतर महाराष्ट्रच नव्हे तर संपुर्ण देशभरात मराठा बांध जल्लोष साजरा करत आहेत. #MarathaReservation मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळाले आहे.

मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सगळीकडे उत्‍साहाचे वातावरण आहे. सोशल मीडियावराही सर्व वातावरण मराठामय झाले आहे. तिकडे विधानसभेत विधेयक मंजूर झाले आणि सोशल मीडियावर अवघ्‍या काही क्षणातच ट्विटरवर #MarathaReservation हा टॅग टॉप ट्रेंडमध्‍ये आला.

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मराठा आरक्षण मिळाल्याने सत्ताधारी भाजपमध्ये जल्लोष सुरू आहे. विधीमंडळावर भाजप सदस्यांनी फेटे बांधून वातावरण निर्मिती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांच्या प्रतिमेला वंदन केले. सगळीकडे उत्‍साहाचे वातावरण आहे. सोशल मीडियानेही मराठा आरक्षणाचे स्‍वागत केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

6 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून अजित पवारांच्या टोल्याला देवेंद्र फडणवीसांनी दिला गुरुमंत्री

Aprna

राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय घेईल !

News Desk

“तुमच्यासारखा नामर्द नाही”, संजय राऊतांच नारायण राणेंना सडेतोड उत्तर

Aprna
क्राइम

संघ मुख्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

News Desk

नागपूर : रॉकेलची बाटली हातात घेऊन एका युवकाने महालमधील शनिवारी सायंकाळी संघ मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. वेळीचसीआयएसएफच्या जवांनानी त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. बेरोजगारीला कंटाळून हा युवक संघ मुख्यालयासमोर आत्मदहनकरण्याच्या प्रयत्नात होता, असे सांगण्यात येते. या घटनेची नोंद कोतवाली पोलिसांनी केली असून, त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन केलेआहे. संतोष, असे या युवकाचे नाव आहे.

संतोष हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तो बीटेक झाला आहे. उच्च शिक्षित असतानाही त्याला नोकरी मिळाली नाही. त्यानेतेथील प्रशासनाला वेळोवेळी नोकरी मिळण्याबाबत विनवणी केली. त्याला कोणीही दाद दिली नाही. त्यामुळे तो हताश झाला होता.

‘मी उच्च शिक्षत आहे, मला नोकरी मिळत नाही. उत्तर प्रदेश प्रशासन मला न्याय देत नाही, संघ मुख्यालयात मला न्यायमिळेल, या मुळे मी येथे आलो आहे’,असे तो सांगत होता. सीआयएसएफच्या जवानांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली.

Related posts

भावजयीच्या प्रेमात दीर झाला बेभान, पत्नी आणि मुलांचा गळा चिरला

News Desk

आंध्रप्रदेशातून अपहरण केलेल्या व्यक्तींची उस्मानाबाद पोलिसांकडून यशस्वी सुटका

Aprna

चोरांनी केली पोलीसांवर दगडफेक

News Desk