HW News Marathi
देश / विदेश

जर फ्रान्स-जर्मनी शांततेत जगू शकतात तर भारत-पाकिस्तान का नाही ?

नवी दिल्ली | पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्ते कर्तारपूर कॉरिडोरचे भूमीपूजन करण्यात आले. त्यावेळी बोलताना, इम्रान खान यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांबाबत विधान केले आहे. “जर एकमेकांशी अनेक युद्ध लढलेले फ्रान्स आणि जर्मनी शांततेत जगू शकतात तर भारत आणि पाकिस्तान का नाही ?”, असा सवाल इम्रान खान यांनी केला.

“मला कळत नाही कि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर एवढ्या प्रमाणात टीका का झाली ? ते तर केवळ शांततेबाबत बोलत आहेत. त्यांनी पाकिस्तानात निवडणूक लढवली तर ते जिंकतील. मला आशा आहे की मला सिद्धूला पंतप्रधानपदी पाहायला आणि दोन्ही राष्ट्रांची मैत्री व्हायला फार वेळ थांबावे लागणार नाही”, असेही यावेळी इम्रान खान म्हणाले. दरम्यान, इम्रान खान यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण तापायला सुरुवात झाली आहे.

“भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता लढाई होणार नाही. कर्तारपूर कॉरिडोर खुला करणे म्हणजे मदीनाची सीमरेषा खुली करण्यासारखे आहे”, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी ‘हिंदू जीवे, पाकिस्तान जीवे अशी घोषणा’ यांनी केली होती. सर्वांनी विचार करण्याची पद्धत बदलली तरच शांतता प्रस्थापित होईल, असेही नवज्योतसिंग सिद्धू यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काश्मीर मुद्द्यावरून अमित शहा आणि अजित डोवाल यांची बैठक

News Desk

शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावे अन्यथा उद्रेक होईल, उदयनराजेंचा इशारा

News Desk

डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांची स्वेच्छानिवृत्ती, बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता !

News Desk
राजकारण

अखेर नोटबंदीच्या निर्णयाबाबत अरविंद सुब्रमण्यम यांनी सोडले मौन

News Desk

नवी दिल्ली | नोटबंदीच्या निर्णयाबाबत मोदी सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी अखेर मौन सोडले आहे. नोटबंदी हा सरकारचा क्रूर निर्णय असून नोटाबंदीमुळे देशाचा आर्थिक विकास मंदावला आहे, अशा शब्दात अरविंद सुब्रमण्यम यांनी मोदी सरकारला फटकारले आहे. ‘ऑफ काउंसिल: द चॅलेंजेस ऑफ द मोदी-जेटली इकॉनॉमी’ या पुस्तकात त्यांनी हा उल्लेख केला आहे.

‘५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद केल्यानं भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा हादरा बसला होता. त्यामुळं आर्थिक विकासदर आठ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांच्या निचांकीवर पोहोचला. एकाच झटक्यात ८६ टक्के चलन हे कागदाचे तुकडे झाले. त्याचा सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्राला बसला’, असे त्यांनी पुस्तकात म्हटले आहे. अरविंद सुब्रमण्यन हे नोटाबंदीच्या वेळी मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते.

सुब्रमण्यन यांच्या दाव्याचा आधार घेत काँग्रेससह विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. दरम्यान, माजी मुख्य आर्थिक सल्लागारांनी अखेर नोटाबंदीमागील सत्य उघड केले आहे, असे म्हणत विरोधीपक्षांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

Related posts

काँग्रेसला यांची थोडी तरी लाज वाटायला हवी !

News Desk

राहत्या वॉर्डात निवडून यायचे वांदे !

swarit

पुलवामा दहशतवादी हल्ला हा गोध्रा हत्याकांडासारखाच भाजपचा पूर्वनियोजित कट !

News Desk