HW News Marathi
मुंबई

माथाडी कामगारांचा आजपासून बेमुदत बंद

मुंबई | माथाडी कामगार आजपासून बेमुदत बंद पुकारणार आहेत. पणन विभागाने २५ आॅक्टोबर आणि कामगार विभागाने २८, २९ आॅक्टोबर आणि २० नोव्हेंबरला काढलेल्या अध्यादेशाला स्थगिती देण्याची मागणी मागणी माथाडी कामगारांनी केली आहे. माथाडी कामगारांच्या या मागणीसाठी बुधवारपासून बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीने मंगळवारी एकदिवसीय बंद पुकारला होता. दरम्यान या कामगारांनी आझाद मैदानात येथे धरणे आंदोलन देखील केले .

कामगारांच्या या मागण्यांबाबत सरकारने मंगळवारी तोडगा न निघाल्याने बुधवारपासून बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनाला व्यापा-यांनीही मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिल्याचा दावा कृती समितीने केला आहे. मंगळवारी नवी मुंबई, कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह काही ठिकाणी काम बंद आंदोलन झाले. सरकार मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हुक्का पार्लरमध्ये तरुणाची हत्या, मलाकाचा तरुणीवर बलात्कार

News Desk

श्रावणी सोमवारी मुंबईतील या मंदिरांमध्ये होते भाविकांची गर्दी…

News Desk

चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीला अटक

News Desk