HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये निपाणीचा जवान शहीद

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबतच्या झालेल्या एक भारतीय जवान शहिद झाला आहे. शहीद झालेल्या जवानाचे नाव प्रकाश पुंडलिक जाधव असे असून ते मुळचे बेळगावच्या बुदिहाळ येथील रहाणारे आहेत. मंगळवारी पहाटे झालेल्या चकमकीत ते शहीद झाले. कुलगाम व पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी दोन वेगवेगळ्या चकमकीत तीन अतिरेकी ठार, तर प्रकाश जाधव शहीद झाले आणि दोन जवान जखमी झाले.

शहीद जाधव यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. प्रकाश जाधव हे २००७ साली मराठा लाइट इन्फंट्रीत बेळगाव येथे भरती झाले होते. दिवाळीला ते घरी येऊन गेले होते. सोमवारी रात्री १० च्या दरम्यान त्यांनी घरच्यांशी संपर्क साधून खुशालीही कळवली होती. पहाटे त्यांना वीरमरण आहे. प्रकाश यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला असून त्यांना ३ महिन्यांची मुलगी आहे. वडील पुंडलिक जाधव यांनीही सैन्यात सेवा बजावली असून ते सध्या निवृत्त आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन पुर्णपणे उघडणार नसल्याचे पंतप्रधानांनी दिले संकेत

News Desk

नोटबंदी एक अविचारी निर्णय | रघुराम राजन

News Desk

उद्धव ठाकरे विनंती आहे, तुम्ही खुदा होऊ नका !

News Desk
राजकारण

राज्यातील सिंचन घोटाळ्याला अजित पवार जबाबदार !

News Desk

नागपूर | सिंचन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी नेते आणि माजी जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सिंचन घोटाळ्याला अजित पवार जबाबदार असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. प्रकल्पाचा निधी वाढवणं, नियमांचा भंग करणं असा ठपका अजित पवारांवर ठेवण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 27 पानांचे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. त्यात अजित पवार हे सिंचन घोटाळ्यासाठी जबाबदार असल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. ठेका देण्याचे पूर्वनियोजित षड:यंत्र रचणे, प्रकल्पाची किंमत वाढवणे, नियमांचे उल्लंघन करणे, राज्याला प्रचंड नुकसान पोहचवणे असा ठपका अजित पवारांवर ठेवण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अजित पवारांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी कधीही अटक होऊ शकते, असं म्हटलं होतं. सिंचन घोटळ्याप्रकरणी पोलीस अजित पवाराच्या दाराबाहेर पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांना केव्हाही अटक होऊ शकते, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे रावसाहेब दानवेंनी वर्तवलेलं भाकीत खरं ठरतं की काय अशी चर्चा रंगू लागली आहे

Related posts

नव्या रामकथेस आवर घाला !

News Desk

कंटाळा झटका, कामाला लागा !

Gauri Tilekar

केरळमधील काँग्रेसचे खासदार एम.आई. शानवास यांचे निधन

News Desk