HW News Marathi
राजकारण

#RamMandir :अवघ्या २४ तासात उद्धव ठाकरे मुंबईला रिटर्न

नवी दिल्ली | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा अवघ्या २४ तासांमध्ये संपला असून ते आता अयोध्येहून मुंबईला परतण्यासाठी निघाले आहेत. उद्धव ठाकरे विशेष विमानाने मुंबईत परतणार आहेत. अयोध्या राम मंदिराचा मुद्दा चांगलाच तापलेला असताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे काल दुपारी ३ च्या सुमारास उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबासह अयोध्येत दाखल झाले होते.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर सर्वच शिवसैनिक अत्यंत उत्साहाने या अयोध्या दौऱ्याच्या तयारीला लागले आणि अयोध्येत दाखल देखील झाले होते. त्याचप्रमाणे सर्व शिवसैनिक रविवारपर्यंत अयोध्येतच थांबणार होते. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सर्व शिवसैनिकांना शनिवारी रात्रीच महाराष्ट्रात परतण्याचे आदेश देण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपुरातील हिवाळी अधिवेशन 30 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार

Aprna

पंतप्रधानांची पत्रकार परिषद…मौन की बात !

News Desk

कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत चौकशीसाठी हजर राहणार?

Aprna