HW News Marathi
देश / विदेश

शोपियानमध्ये ५ दहशतवाद्यांना कंठस्नान

श्नीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. भारतीय लष्कर आणि दहशतवाद्याच्यांत दोन्ही बाजूंनी गोळीबार झाल्यानंतर लष्कराकडून संपुर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. यावेळी जवानांनी दिलेल्या प्रत्युतरात पाच दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. या चकमकीत लष्कराचा एक जवान जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शोपियान जिल्ह्यातील कपरान बटागुंड क्षेत्रामध्ये भारतीय लष्करांना दहशतवाद्यांची लपल्याची सूचना मिळाल्यानंतर जवानांनी शोध मोहीम सुरू केले होते. सुरक्षेच्या दृष्टीने शोपियांमधील इंटनेट सेवा बंद करण्यात आली आहे. याआधी शक्रवारी (२३ नोव्हेंबर)ला शोपियानमध्ये अज्ञात बंदूकधारकांनी एका माजी विशेष पोलिस अधिकाऱ्या(एसपीओ) बरोबर स्थानिक तीन लोकांचे अपहरण केले होते. तर गेल्या आठवड्यात दक्षिण-काश्मीरमध्ये लष्काराचे गुप्तहेर असण्याच्या संशयावरून दहशतवाद्यांनी दोन लोकांना मारले होते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युद्ध नाही तर चर्चेच्या मार्गानेच काश्मीर प्रश्न मार्गी लागेल !

News Desk

अवनी वाघिणीचे बछडे देखील नरभक्षक होण्याची शक्यता ?

Gauri Tilekar

“कोरोना वायरस म्हणून अपमान केलेल्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा!”

News Desk