HW News Marathi
राजकारण

RamMandir : अयोध्येतील व्यापाऱ्यांच्या विरोधाची तलवार म्यान

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे आपल्या व्यापाराचे मोठे नुकसान होईल या भीतीने उद्धव ठाकरेंच्या या अयोध्या दौऱ्याला तेथील व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत होता. मात्र आता येथील व्यापाऱ्यांचा विरोध अखेर मावळला आहे. एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या अयोध्या वारीला विरोध करणारे व्यापारी आता उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.

शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यामुळे व्यापारी वर्गाला कोणत्याही प्रकारचे नुकसान सहन करावे लागू नये, अशी मागणी अयोध्येतील व्यापारी वर्गाने केली होती. मात्र शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी या व्यापाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर व्यापाऱ्यांनी आपली विरोधी भूमिका अखेर बदलली असून आता उद्धव ठाकरेंच्या स्वागताच्या तयारीला लागले आहेत.

शिवसेना हा पक्ष म्हणजे एक अत्यंत कट्टर आणि उग्र अशी संघटना आहे, असा अयोध्येतील जनतेचा समज आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यामुळे तेथील जनतेच्या मनात भीती आहे. शिवसेनेच्या या दौऱ्यामुळे अयोध्येतील व्यापारी वर्गात देखील मोठे भीतीचे वातावरण पसरले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MCA निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलारांची युती; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

अर्थसंकल्प सादर करताना काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांकडून झाली मोठी चूक

Aprna

हार्दिक पटेलला लोकसभा निवडणूक लढविता येणार नाही ?

News Desk