HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“…हिम्मतवाला माणूस अटकेला कशाला घाबरतो?”, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

मुंबई | “आम्ही वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजतो, असा हिम्मतवाला माणूस अटकेला कशाला घाबरतो”, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचे षडयंत्र रचले गेले, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांच्या आरोपावर संजय राऊतांनी आज (15 फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस ते वारंवार बोलायला लागले आहे की, मला अटक करणार होते, मला अटक करणार होते. कधी काळची त्यांची भाषण ऐकलेली आहेत. आम्ही वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजतो, असा हिम्मतवाला माणूस अटकेला कशाला घाबरतो, असा उलट सवाल उपस्थित करत संजय राऊतांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. संजय राऊत म्हणाले, “आम्ही घाबरलो का?, आमच्यावर खोटे खटले दाखल केले. अनिल देशमुखांवर खोटे खटले दाखल केले. नवाब मलिक यांच्यावर खोटे खटले दाखल केले. अनेकांवर देशभरात खोटे खटले दाखल केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून धाडी टाकत आहेत. तेव्हा तुम्हाला हे प्रश्न पडत नाहीत का?, आपण आपल्या राजकीय सहकार्यावर भेलेही आम्ही विरोधक असो पण आम्ही तुमचे राजकीय सहकारी आहोत. तुम्हाला असे वाटत नाही का? चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यासाठी उत्तेजन देत आहोत.”

कोणीही फडणवीसांना अटक करणार नव्हते

“दुसऱ्या बाजूला तुमच्या पक्षातील चोर आणि लफंगे त्यांना तुम्ही क्लीनचीट देता. विक्रांत घोटाळा असेल, लोकांचे पैसे गोळा केलेले आहेत. हे कागदावर आहेत. त्यांना तुम्ही क्लीनचीट देता. बँकांना लुटणारे त्यांना क्लीनचीट देता, अशी अनेक प्रकरणे आहेत. आमचे फोन टॅप करणारे, आमचे फोन चोरून ऐकणारे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. तुम्ही तपास पुर्ण झाल्याशिवाय त्यांच्यावरील गुन्हे कसे काय मागे घेऊ शकता. ही तुमची काम करण्याची पद्धत आहे का? आणि स्वत: संदर्भात चौकशीचे काही प्रकरण आले तर मग बोबाटा करायचा मला अटक करणार, कोणीही त्यांना अटक करणार नव्हते. अडीच वर्षामध्ये अशा प्रकारचे घाण्यारे कृत्य महाविकास आघाडी सरकारमध्ये कधी झाले नाही आणि उद्धव ठाकरेंनी केलेली नसते. अत्यंत सभ्य सुसंस्कत असे मुख्यमंत्री होते,” तुरुंगात टाकण्यावर राऊत म्हणाले.

पुन्हा एकदा महाराष्ट्रात आमचे सराकर येणार

फडणवीसांना संजय राऊतांनी अनेक सवाल विचारत म्हणाले,  “राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याला कोणी अटक करते का?, तुमचा जबाब घेईला ही जायाचे नाही का?, आमच्याकडे येतात. माजी  नरसंहराव प्रधानमंत्री झाल्यावर त्यांच्याकडे गेले. माजी पंतप्रधान  इंदिरा गांधींनाही अटक झाली. त्यांच्याकडेही तपास अधिकारी जात होते. उद्या मोदी सत्तेवरून उतरल्यावर अनेक अशी प्रकरणे आहेत. अमित शहा सत्तेवरून उतरल्यावर त्यांच्याकडेही पोलीस जबाब मागायला जातील. काही जुने प्रकरणे निघाली. मग तुमच्यापर्यंत लोकांनी पोहोचायचे नाही का? ही कोणती यंत्रणा तुम्ही आम्हाला सांगत आहात. जर कायद्याचे राज्य असेल, आणि कायद्याने काही गोष्टी होत असतील तर आपण सर्वांनी सामोरे जावे. आम्ही गेलो ना हिम्मतीने आम्ही रडत बसलो का?, आम्ही काल लढलो, आज लढतोय आणि उद्याही लढत राहू. याच लढाईतून पुन्हा एकदा आमचे सरकार या महाराष्ट्रात येईल. हे तुम्ही लिहून घ्या.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वांद्रे गर्दी प्रकरण, वांद्रे सत्र न्यायालयाकडून पत्रकार राहुल कुलकर्णींना जामीन

News Desk

निकालापूर्वी विजयी मिरवणूक काढणाऱ्या रत्नागिरीच्या उमेदवारवर गुन्हा दाखल

News Desk

राज्यात काल 2, 069 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

News Desk