HW News Marathi
राजकारण

नितेश राणेंकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न

मुंबई | ‘जे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारू शकत नाहीत, ते अयोध्येत राम मंदिर काय उभारणार ?’ असा खोचक टोला काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांसह आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारुन नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

‘ते अयोध्येला जाऊनही केवळ राजकारण करत आहेत. राम मंदिर उभारण्याची त्यांची कुवत नाही’, अशा कठोर शब्दात यावेळी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेने याआधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील शिवाजी महाराजांच्यापुतळ्यावर छत्र लावण्याची घोषणा केली होती. मात्र, त्याआधीच नितेश राणे यांनी स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांसह मिळून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारून आंदोलन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपातील दिग्गज मोदींवर भडकले, राष्ट्रमंचच्या कार्यक्रमात मोदीविरोधी सूर

News Desk

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलं अर्थसंकल्प सादर होणार; शेतकरी, मध्यमवर्गीयांच्या वाटेला काय येणार?

Aprna

क्षयमुक्त भारताचे उद्दिष्ट यशस्वी करावे; राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

Manasi Devkar
देश / विदेश

मोफत अन्नधान्य पुरविल्यामुळे लोक आळशी होतात | मद्रास उच्च न्यायालय

News Desk

चेन्नई। तांदूळ किंवा अन्य अन्नधान्य मोफत पुरविल्यामुळे लोक आळशी होतात आणि त्यामुळे उत्तरेकडील लोकांना नोकरीवर ठेवावे लागते, असे मत मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायालय आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना मोफत तांदूळ देण्याविरोधात नाही. पण अशा योजनेचा लाभ सरसकट सर्वांना द्यायला नको, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मद्रास उच्च न्यायालयात तांदूळ तस्करी केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या आरोपीच्या याचिकेवर न्या. एन. किरुबाकरन आणि न्या. अब्दुल कुद्दोस यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु होती.

सरकारी तिजोरीतून २०१७-१८ या आर्थिक वर्षात २ हजार ११० कोटी रुपये मोफत तांदूळ वाटपासाठी खर्च करण्यात आले होते. ही खूप मोठी रक्कम असून सरकारसाठी हे प्रकारचे नुकसानच आहे. या पैशांचा वापर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी करता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दारिद्र्यरेषेखालील लोकांना मोफत धान्य दिलेच पाहिजे. सरकारने यासंदर्भात अहवाल तयार करुन दारिद्र्य रेषेखाली किती कुटुंब आहेत, यातील किती लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे, याची माहिती द्यावी, असे निर्देशही न्यायालयाने या सुनावणी दरम्यान दिले आहेत.

Related posts

“शेजारी पाहा काय घडतय”, मेहबूबा मुफ्ती यांचा पंतप्रधानांना इशारा

Jui Jadhav

केरळमधील महापुराला राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करा | काँग्रेस

News Desk

राष्ट्रपतींच्या कन्या आहे एअर होस्टेस.. आता तिला मिळाली मोठी जबाबदारी

News Desk