HW News Marathi
देश / विदेश

तामिळनाडुमध्ये वादळग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय नौसेना दाखल

तामिळनाडु | बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे निर्माण झालेल्या गाजा चक्रिवादळाने तामिळनाडुमध्ये हाहाकार माजवाला आहे. आतापर्यंत या वादळामुळे २८ जणांचा मृत्यू झाला असुन यामुळे जवळपास ११ जिल्ह्यामध्ये परिणाम झाला आहे. तामिळनाडुतील नागरिकांच्या मदतीसाठी नागपट्टनम येथे तैनात असलेल्या भारतीय नौसेना दाखल झाली आहे. रस्त्यावर पडलेली झाडं, इमारतीचा मलबा हटवण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे.

१६ नोव्हेंबर पासुनच मदत व उपाययोजना सुरु करण्यात आल्या त्या १७ नोव्हेंबर रोजी पण सुरुच राहतील.

अधिकाऱ्यांच्या मते, कुडलोर, नागापट्टिनम, रामानथापुरम, थंजावूर, पुदुकोट्टई आणि तिरुवरा जिल्ह्य़ातील 81,948 लोकांना 471 मदत केंद्रातून बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत या वादळामुळे राज्यभरात 1,27,448 वृक्ष पडले आहेत. अनेक इलेक्ट्रिचे खांब कोसळले आहे. वादळग्रस्त भागात स्वच्छता करण्यासारखे सर्व चक्रीवादळ कार्य सुरु झाले आहेत. प्रशासनाने विनंती केल्याप्रमाणे कराइकल येथे नौसेनेकडुन भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील नागरीकांसाठी जवळपास २१६ मदत शिबीरे आयोजीत करण्यात आले आहे. मच्छीमारांना यापुर्वीच बंदरत परत येण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यासाठी चेतावणी जहाजे आणि विमान

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान प्रकरणात १ रुपयाचा दंड

News Desk

राहुल गांधी अमेठीतून तर सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढणार

News Desk

भारतीय संविधान जगासाठी आदर्श!; मंत्री धनंजय मुंडेंनी दिल्या संविधान दिनाच्या शुभेच्छा

News Desk
मुंबई

मुलुंड-ऐरोली टोलनाक्यांवरील टोल वसुली महिन्याभरासाठी बंद

swarit

मुंबई | मुंब्रा बायपास रोडचे काम सुरु असल्याने मुलुंडमधील दोन टोलनाके तर ऐरोलीतील एक टोलनाक्यांवरची टोलवसुली बंद करण्यात आली आहे. परंतु ही टोलवसुली फक्त लहान वाहनांसाठी बंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत प्रवाशांना होणाऱ्या मनस्तापामुळे राज्य सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

ही टोलवसुली साधारण महिन्याभरासाठी बंद राहील. म्हणजेच २१ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर पर्यंत लहान वाहनांची टोल वसुली बंद राहील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ही टोलवसुली बंद करण्याची मागणी करून स्वतः देखील हे टोलनाके बंद पडण्याचा प्रयत्न केला होता.

Related posts

लोकल अजूनही रुळांवर येईना!

News Desk

मुंबईत आजचा पारा 13.8 अंशावर पोहोचला

Aprna

किंग्ज सर्कलजवळील पुलाखाली अडकलेला कंटेनर हटवण्यात यश

News Desk