HW News Marathi
मुंबई

नेरूळ-उरण उपनगरीय रेल्वेसेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

नवी मुंबई | नेरूळ ते उरण रेल्वेमार्गावरील पहिल्या टप्प्यातील उपनगरीय रेल्वेसेवा आज(११ नोव्हेंबर) खारकोपरपर्यंत सुरू झाली. या सेवेचा उद्घाटन सोहळा आज खारकोपर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व रेल्वे व कोळसा मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत पार पडला. मुंबई, नवी मुंबई आणि एमएमआरडीए अंतर्गत येणारा परिसर येथे निर्माण होणाऱ्या वेगवान दळणवळण सुविधांचा फायदा रायगड जिल्ह्यापर्यंत होणार असल्याचे पाहता. हे सर्व क्षेत्र एकत्र केल्यानंतर महामुंबई’ म्हणूनच विचार करावा लागेल. यासाठी शासन विकासाचे नियोजन व प्रयत्न करीत आहे, नवी मुंबईचा विकास पाहता राज्याचे फडणवीस यांनी या सेवेच्या उद्घाटन सोहळ्यावेळी बोलत होते.

तसेच वसई रोड-दिवा-पनवेल-पेण या मार्गावर आता डेमुऐवजी मेमु सर्व्हिस चालवली जाणार आहे. म्हणजे दिवा ते पेण या मार्गावर आधी जिथे डिझेलवर धावणारी गाडी होती. तिथे आता विजेवर चालणारी गाडी धावेल. पनवेल ते पेण या मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. त्याचेही आज लोकार्पण झाले आहे. त्यामुळेच आता मेमु गाडी या मार्गावर चालवली जाणार आहे.

तसेच परळ स्टेशन नवीन प्लॅटफॉर्म, शिवडी,मुंब्रा, भांडूप, परळ, कळवा, घाटकोपर येथे नवीन ओव्हरब्रिज, सर्वच २७३ उपनगरीय रेल्वे स्थानकावरील प्लेटफॉर्मचे उंची ९०० मिमीने वाढवली २३ स्थानकांवर ४१ एक्सलेटर्स, ६ स्थानकांवर १०लिफ्ट, ६ स्थानकांवर नवीन शौचालय, ७७ स्थानकांवर ३१८ एटीव्हीएम सुविधा, ६ स्थानकांवर २०६ सीसीटीव्ही कॅमेरा सुविधा, भिवंडी-नावडे रोड येथील २ नवीन बुकिंग ऑफिसेस, सानपाडा ईएमयू कारशेड येथे १ मेगा वॅट सौर ऊर्जा प्रकल्प या विविध लोकोपयोगी सुविधांचे लोकार्पणही करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई पोलिसांसाठी ऑन ड्यूटी ८ तास

swarit

राहुल गांधी मुंबईमध्ये दाखल, शिवडी न्यायालयात हजर राहणार

News Desk

दिल्लीसह मुंबईतील बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

Aprna
महाराष्ट्र

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा शुभारंभ

News Desk

मुंबई | आता महाराष्ट्रातील शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यातील शाळांची निवड करण्यात आली आहे. त्या शाळांमध्ये आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मंगळवारी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुंबईमध्ये झालेल्या कार्यक्रमात या १३ शाळांची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हे उपस्थित होते. निवड करण्यात आलेल्या या १३ शाळांना ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा’ असे संबोधण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अटलजींनी नेहमीच विविध क्षेत्रात सर्व पध्दतीने विकास करुन देशाला दिशा दिली, देशाच्या विकासाचा दर वाढविला. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतीयांना भारतातच आंतरराष्ट्रीय शिक्षण देण्याच्या या उपक्रमाचा शुभारंभ म्हणजेच अटलजींना खऱ्या अर्थाने ही श्रध्दांजली आहे.

राज्यातील मुलांना त्यांच्या मातृभाषेतूनच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, त्याचप्रमाणे त्यांना जगातल्या विविध भागाचे ज्ञान व्हावे या उद्देशाने राज्य शासनाकडून महाराष्ट्रातील १०० शाळांना आंतरराष्ट्रीय शाळांचा दर्जा देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पुणे, सातारा, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नंदुरबार, परभणी, चंद्रपूर, गोंदिया, बुलढाणा, वाशिम या १३ जिल्ह्यातील शाळांची निवड करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

या शाळांच्या निवडीसाठी विविध प्रकारचे निकष ठरविण्यात आले आहेत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय शाळांसाठी घटकांचा पुढाकार, शाळेतील विद्यार्थी पटसंख्या, मूलभूत पायाभूत सुविधा ज्यामध्ये शाळेची प्रवेश क्षमता, इंटरनेट सुविधा, स्वच्छ परिसर, तंत्रज्ञानाच्या वापरासाठीच्या सुविधा, विद्यार्थ्यांची वाहतूक सुविधा अशा अनेक निकषांच्या आधारे या शाळांची निवड करण्यात आली आहे.

Related posts

आजपासून राज्यातील नाट्यगृह खुली; अजित पवार म्हणाले, “किती वेळा वाजवायची…”

News Desk

मीरा NX हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थेटर प्रमुख महिला कर्मचारीचा संशयस्पद मृत्यू

News Desk

राज्यातील एकही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही! – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

Aprna