HW News Marathi
महाराष्ट्र

जायकवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नाशिक | अहमदनगर-नाशिकच्या धरणातून मराठवाड्यातील जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत आज (३१ ऑक्टोबर)ला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. जायकवाडीला पाणी सोडण्यास अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

नाशिकमधील गंगापूर आणि दारणा, तसेच अहमदनगरच्या भंडारदरा आणि निळवंडे या धरणांतून एकाच वेळी पाणी सोडण्याचं नियोजन करण्यात आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे मराठवाड्याला पाण्यासाठी गेली दोन दिवस वाट बघत आहे.

धरणात ऐवढे पाणी सोडले जाणार

जायकवाडी धरणामध्ये मुळामधून ५४ दलघमी १.९० टीएमसी, प्रवरामधून १०९ दलघमी ३.८५ टीएमसी, गंगापूर धरणातून १७ दलघमी ०.६० टीएमसी, दारणा धरणातून ५७.५० दलघमी २.०४ टीएमसी, पालखेड समुहातून १७० दलघमी ६० टीएमसी असं एकूण २५४ दलघमी (८.९९ टीएमसी) अशा विविध धरणांमून पाणी सोडण्याचे आदेश देण्यात येणार आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बारामती नगरपरिषदेच्या ठरावाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली!

News Desk

उद्धव ठाकरेंचं निर्मला सीतारमण यांना पत्र, पूरग्रस्तांसाठी केली ‘ही’ मागणी!

News Desk

राज्य मंत्रिमंडळातील फेरबदल हा भ्रष्टाचार आणि अपयश दडपण्याचा प्रयत्न !

News Desk
देश / विदेश

कॉमनवेल्थ गेम्समधील महिला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक

News Desk

सिडनी | २१व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने सुवर्ण पदक पटकावले आहे. मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये ४८ किलो वजनीगटात ८६ किलो उचलत भारताला सुर्वण पदकाला गवसणी घातली आहे. मीराबाईने पहिल्या प्रयत्नात ८० किलो वजन उचलले. त्यानंतर ८४ आणि ८६ किलो वजन उचलून सुर्वण पदक मिळवले.

भारताचा गुरु राजा यांनी ५६ वजनीगटात २४९ किलोचे वजन उचलत भारताला रौप्य पदक मिळवले. तसेच मलेशियाच्या मुहम्मद अझहर अहमद यांनी २६१ किलो वजन उचलत सुवर्ण पदक पटकावले. तर श्रीलंकेचा अशून चुतरंगा लकमल यांनी २४८ किलो वजन उचलत कास्य पदक मिळवले. भारताकडे महिला आणि पुरुष वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण आणि रौप्य अशी दोन पदक मिळवण्यात यश आले आहे.

Related posts

शैक्षणिक संस्थांनामध्ये हिजाब बंदी योग्यच; कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय

Aprna

थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि शरद पवारांची भेट? भाजपविरोधातील पुढील रणनीती ठरणार

News Desk

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात, पत्नीचा झाला मृत्यु

News Desk