HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य मंत्रिमंडळातील फेरबदल हा भ्रष्टाचार आणि अपयश दडपण्याचा प्रयत्न !

मुंबई | भाजप-शिवसेना राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील फेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि गेल्या साडेचार वर्षातील अपयश दडपण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. “या सरकारने कितीही प्रयत्न केले तरी ते आपले भ्रष्टाचाराचे पाप लपवू शकणार नाही”, असा इशाराही देखील अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

“प्रकाश मेहता आणि अन्य मंत्र्यांवर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सरकार अडचणीत आले आहे. लोकायुक्त आणि न्यायालयांनी मंत्र्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात कारवाईचे आदेश दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. प्रकाश मेहतांविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई सुरू न करता त्यांना केवळ मंत्रिमंडळातून वगळून या प्रकरणावर पडदा पाडण्याचा भाजप-शिवसेनेचा प्रयत्न सुरू आहे”, असे अशोक चव्हाण म्हणाले.

“गेल्या साडेचार वर्षांचा राज्य सरकारचा कारभार अत्यंत निराशाजनक आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी आपले हे अपयश झाकण्यासाठी म्हणून मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा चेहरा-मोहरा बदलल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न चालवला आहे. परंतु, निवडणुकीला आता जेमतेम ४ महिने शिल्लक असून, या फेरबदलांमधून सरकारच्या हाती काहीही येणार नाही”, असेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणे यांची कॉँग्रेसला सोडचिठ्ठी

News Desk

होळी घराच्या दारात पेटवायची नाही, मग काय घरात पेटवायची? भाजपचा सरकारला सवाल

News Desk

माझा शेतकरी चोर आहे का ?

swarit