HW News Marathi
मुंबई

पालिका बांधणार २२ हजार शौचकुपे 

मुंबई | गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू असलेल्या मुंबईतील धोकादायक शौचालये, तूटलेले दरवाजे, लादया यामुळे झोपड़पट्यांमधील नागरिकांची मोठी गैरसोय होत असून या पालिकेचा शौचयाले बांधणीचा कार्यक्रम फेल ठरला होता. पण अखेर चौथ्या बैठकीनंतर 22 हजार शौचकूपे बांधणीला आज पालिका स्थायी समितीची मंजूरी मिळाली आहे. स्वच्छ भारत अभियानाला आता गती मिळणार आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुमारे दीड कोटी जनता राहत असून या जनतेला पालिका दररोज मुलभूत सेवा सुविधा पुरवत आहे. या नगरीत शौचालये अपुरी आहेत. नव्याने शौचालय बांधनीला गति मिळत नाही. शौचयाले कुठे बांधायची याबाबत नगरसेवकाना विश्वासात घेतले जात नाही. कंत्राटदारांचा महत्त्वाचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शौचयाले बांधनीच्या कार्यक्रम फसत आला आहे. आता विभागवार निविदा काढून २२ हजार शौचालयांच्या बांधनीच्या कार्यक्रम पालिके हाती घेणार आहे. पालिकेच्या स्थायी समितीच्या चार बैठका यावरून पहिल्या चांगल्याच गाजल्या होत्या मात्र अखेर या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे.

तर भाजपचे सदस्य प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनावर भडीमार केला. तर शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी तर आपल्या विभागात दोन वर्षापूर्वी तुटलेले शौचयाल अजून बांधले नाही. अशी खंत व्यक्त केली. सपाचे गटनेते रईस शेख, शिवसेनेच्या राजुल पटेल यांनीही प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. चार वेळा हा विषय बैठकीत येणे हे प्रशासनाचे आणि सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे. प्रशासन सत्ताधारयाना जुमानत नाही हे यातून दिसून येत आहे. एक वर्षात जे झाले नाही ते तीन महिन्यात कसे होणार, असा सवाल पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. तर पालिकेच्या वतीने उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी स्वछ भारत अभियानान्तर्गत शौचयाले बांधणीचा कार्यक्रम वेगाने हाती घेतला जाईल. धोकादायक शौचालयांना प्राधान्य क्रम दिला जाईल. बांधकामे सुरु होतील तेथे पर्यायी सोय म्हणून मोबाईल टॉयलेट उपलब्ध केली जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मालाडमध्ये भीषण आग

News Desk

पतंगराव कदम यांचा अल्पपरिचय

News Desk

दगडफेक उद्धव ठाकरे यांच्या वाहनावर नव्हे तर आमदार विजय औटी यांच्या गाडीवर

News Desk
राजकारण

काँग्रेसने शेतकऱ्यांना बरबाद केले, पंतप्रधान मोदींची जहरी टीका

News Desk

लखनऊ | पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (२९ डिसेंबर) उत्तर प्रदेशच्या गाजीपूर आणि वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी वाराणसीच्या आधी गाजीपूरचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी महाराजा सुहेलदेवचे डाक तिकीट जारी केले. यावेळी आरटीआय मैदानावर लोकांना संबोधित करीत असताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या कर्जमाफीच्या वचनावर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले कि, “कर्नाटकमध्ये काँग्रेसने कर्जमाफीची घोषणा करून लोकांची मते चोरली आणि सत्ता स्थापन झाल्यानंतर केवळ ८०० शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. हा कोणता खेळ आहे, हा कोणता विश्वासघात आहे. काँग्रेसने शेतकऱ्यांना बरबाद केले. त्यांनी स्वामिनाथन आयोगाची शिफारस लागू केली नाही. आमच्या सरकारने ही शिफारस लागू केली.”

“गाजीपूरमध्ये नवे मेडिकल कॉलेज, गोरखपूरमध्ये एआयआयएमएस, वाराणसीमध्ये आधुनिक रुग्णालय, जुन्या रुग्णालयाचा विस्तार असो ही सर्व कामे आता लवकरात लवकर पूर्ण होतील. आज देशातील गरिबातील गरीब व्यक्तीसाठी आपल्या समस्या सरकारपुढे मांडण्याचा मार्ग खुला आहे. त्याचप्रमाणे त्यांना सन्मानाचे जीवन देण्यासाठीच्या अभियानाची ही सुरुवात आहे,” असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. “येणारी वेळ ही तुमची आहे, तुमच्या मुलांची आहे. तुमचे भविष्य सुधारण्यासाठी तुमचा चौकीदार खूप प्रामाणिकपणे, खूप कष्ट करून दिवसरात्र एक करीत आहे”, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Related posts

मी माझ्या घरातील मुलांचे बालहट्ट पुरवणार, दुसऱ्यांचे कशाला!

News Desk

Raj Thackeray ED Live Updates : साडेआठ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे बाहेर

News Desk

रामाचा वनवास 2019 पूर्वी संपवा !

News Desk