HW News Marathi
मुंबई

पाण्याच्या बिलासाठी पालिका मोजणार ३ कोटी ५५ लाख रुपये

मुंबई | मुंबईत सुमारे दिड कोटी जनता राहत असून या जनतेला पालिका दररोज पाणी पुरवठा करत आहे. मात्र काही ग्राहक वेळेत बिले भरत नाही. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढत असून पालिकेने आता नवीन योजना आणली आहे. मुंबईत पाण्याचा वापर करणा-या ग्राहकांना पाण्याची बिले घरपोच देण्याचा निर्णय घेतला आहे. ही बिले टपाल खात्याकडून घरपोच केली जाणार आहेत. या टपाल खात्याला पालिका या कामासाठी चक्क तीन कोटी ५५ लाख ( ३.५५ ) रुपये मोजावी लागणार आहे. ९० लाख पाणी बिले वितरित केली जाणार असून हे कंत्राट पाच वर्षासाठी असणार आहे. प्रति लिटर पाण्यामागे बिलासाठी ३.८० रुपये दर मोजणार लागणार आहेत.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला पालिका जलविभाग सात तलावातून दररोज तीन लाख ७५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करते. या पाणी वापराचे जलदेयके टपाल खात्यामार्फत पाठवली जातात. त्यासाठी पालिका टपाल खात्याला एका पाणी बिलासाठी ठराविक रक्कम देते. पालिका हद्दीत सध्या ४.१२ लाख जलजोडण्या आहेत. पाण्याचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी पालिका दरमहा अथवा तीन महिने चक्राप्रमाणे बनवली जातात.त्यासाठी दररोज ५ हजार जल देयकांची छपाई करण्यात येते. त्यानंतर देयकांचे संगणकीकरण करण्यात येते.

ग्राहकांना या जल देयकांचे वितरण दरमहा, तिमाही केले जाते. टपाल खाते पालिकेकडून बिल मेल सर्विस सेवा दर म्हणून ३ रुपये , फ्रँकिंग चार्जेस ४० पैसे, विशेष हँडलिंग चार्जेस म्हणून ३० पैसे व पिनकोडनुसार वर्गीकरणासाठीच्या आकारापोटी १० पैसे असे एकूण ३.८० रुपये प्रति पाणी बिल असे दर आकारणार आहे. ६० महिन्यांसाठी टपाल खाते ९० लाख पाणी बिलासाठी एकूण ३ कोटी ५५ लाख रुपये पालिका मोजणार आहे तसा प्रस्ताव पालिका स्थायी समितीने मंजूर केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे फक्त अस्थापना आणि प्रशासनासाठीच्या खर्चाची केलेली बेगमी -सचिन अहिर

News Desk

दादर सांस्कृतिक मंचातर्फे मोदकोत्सव २०१८चे आयोजन

swarit

कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू, २ अभियंत्यांना अटक

News Desk
देश / विदेश

कोलकातामधील कालव्यात बस कोसळून, ६ जणांचा मृत्यू

swarit

कोलकाता | पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यामधील हरिपाल येथे एक बस कालव्यात कोसळून भीषण आपघात घडला आहे. या अपघातात ६ जणांता मृत्यू झाला असून २२ जाणांपैकी २ जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात मंगळवारी (१६ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घटना घडील आहे. ही बस कोलकाताच्या दिशने जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुकेश जैन यांनी दिली आहे. बस पुलावरील कठड्याला धडक बसल्याने कालव्यात कोसळली आहे.

 

Related posts

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांची घोषणा, हा तर ओबीसींवर घोर अन्याय !

News Desk

INX Media Case : चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा नाही, तर ईडीकडून लूकआऊट नोटीस

News Desk

देशातील एकूण कोळसा उत्पादनात ७४.७८ दशलक्ष टनांची वाढ

Aprna