HW News Marathi
महाराष्ट्र

गावठी कट्ट्यातून गोळी सुटल्याने बालकाचा मृत्यू

अहमदनगर | गावठी कट्टय़ासोबत खेळताना चुकून गोळी उडाल्याने १२ वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात घडली. याप्रकरणी मृत मुलाच्या चुलत्याविरोधात राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य भैरवनाथ मोरे (१२) असे मृत बालकाचे नाव आहे. नवनाथ नामदेव मोरे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

मुलाची आई जया मोरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आदित्य घरात खेळत असताना गावठी कट्टा त्याच्या हाती लागला. कट्टय़ाचा ट्रिगर दाबताच गोळी छातीच्या उजव्या भागातील बरगडीत घुसल्याने आदित्य जमिनीवर कोसळला. दरम्यान, गोळीबार झाल्याचा आवाज झाल्याने बाहेर असलेल्या नातेवाईकांनी घराकडे धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गणेश चतुर्थीच्या बैठकीला राणे परिवाराला का बोलवलं नाही ?

News Desk

“वाझेंची नियुक्ती करू नका म्हणून शरद पवार, राऊत, देशमुखांना भेटलो”,अबू आझमींचा गौप्यस्फोट

News Desk

मुख्यमंत्री आज जाणार अण्णांच्या भेटीला

News Desk
महाराष्ट्र

आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा मूक मोर्चा

Gauri Tilekar

पुणे | पुण्यातील मुस्लिम समाजाकडून रोजगार आणि शैक्षणिक क्षेत्रातील मुस्लिम समाजाला दिले गेलेले ५ टक्के आरक्षण कायम करावे या मुख्य मागणीसाठी गोळीबार मैदान ते विधानभवनापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे या मूक मोर्चात नियोजनासाठी सुमारे तीन हजार स्वयंसेवक तैनात आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा मुस्लिम समाजाकडून हा मोर्चा काढण्यात आला आहे.

 

मुस्लिम समाजाव्यतिरिक्त इतर अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्तेदेखील या मोर्चात सहभागी झाले आहेत. मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण कायम करावे त्याचप्रमाणे गोरक्षा, लव्ह जिहाद यासारख्या मुद्द्यांमुळे केवळ संशयावरून विनाकारण अनेक मुस्लिमांची मॉब लिंचिंगद्वारे झालेल्या हत्या या विरोधातही या मूक मोर्चात अनेक फलक दिसत आहेत. दलित व मुस्लिमांवरील जातीय, धार्मिक अत्याचाराच्या घटना रोखण्यात याव्यात तसेच मुस्लिम समाजाला अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण मिळावे या मागण्यादेखील या मोर्चामार्फत केल्या जात आहेत.

 

 

 

 

Related posts

‘परमबीर सिंह यांची हायकोर्टात याचिका’, चांदिवाल आयोगाची गरच काय!

News Desk

राज्यात दिवसभरात ८ हजार १९६ रुग्ण कोरोनामुक्त १५८ रूग्णांचा मृत्यू!

News Desk

भोकर, बेंबर संयुक्त वन व्यवस्थापन समितीला ” संत तुकाराम वन ग्राम पुरस्कार “

News Desk