HW News Marathi
महाराष्ट्र

गावठी कट्ट्यातून गोळी सुटल्याने बालकाचा मृत्यू

अहमदनगर | गावठी कट्टय़ासोबत खेळताना चुकून गोळी उडाल्याने १२ वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात घडली. याप्रकरणी मृत मुलाच्या चुलत्याविरोधात राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य भैरवनाथ मोरे (१२) असे मृत बालकाचे नाव आहे. नवनाथ नामदेव मोरे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

मुलाची आई जया मोरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आदित्य घरात खेळत असताना गावठी कट्टा त्याच्या हाती लागला. कट्टय़ाचा ट्रिगर दाबताच गोळी छातीच्या उजव्या भागातील बरगडीत घुसल्याने आदित्य जमिनीवर कोसळला. दरम्यान, गोळीबार झाल्याचा आवाज झाल्याने बाहेर असलेल्या नातेवाईकांनी घराकडे धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही- गोपीचंद पडळकर

News Desk

भाजप नेत्यांच्या गळतीला थांबवण्यासाठी आता फडणवीस उतरणार रिंगणात

News Desk

दर्जेदार रस्ते व पुलांमुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार! – नितीन गडकरी

Aprna