HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

गिरगावात रंगला ‘होम मिनिस्टर’चा खेळ

मुंबई | नवरात्रीचा उत्सव दिवसेंदिवस अधिक रंगतदार होताना दिसत आहे. मुंबईतील परंपरा जपणाऱ्या गिरगावातील विविध वाड्यांमध्ये वैविध्यपूर्ण खेळांची रंगत वाढत आहे. आकांक्षा प्रतिष्ठान आयोजित आणि महालक्ष्मी होम मेकर्स सहप्रायोजित गिरगाव शारदोत्सवानेही विविध उपक्रमांच्या माध्यमातून गिरगावातील स्त्रियांसाठी खेळ आणि स्पर्धा यांचे आयोजन केले आहे.

या निमित्ताने मुगभाट लेन परिसरात होम मिनिस्टर कार्यक्रम रंगला होता. लहानपणीच्या खेळापासून ते विविध कौशल्य पणाला लावणाऱ्या काही स्पर्धा इथे घेण्यात आल्या. त्यातून अंतिम विजेती निवडून होम मिनिस्टर ठरलेल्या सुषमा मेस्त्री यांना मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रत्येक फेरीत बाद झालेल्या स्त्रियांनाही भरघोस बक्षिसे देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी अगडबम फेम अभिनेत्री तृप्ती भोईर यांची विशेष उपस्थिती हजेरी लावली. भोईर यांच्या आगामी अगडबम या चित्रपटाच्या अनोख्या मेकअपच्या आणि मेकिंगच्या गंमतीजमती स्त्रियांशी संवाद साधताना सांगितल्या. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आर. जे. रश्मी वारंग यांनी केले. आकांक्षा प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष स्वरदा सुदीप नाईक, शिवसेना उपनेत्या मीनाताई कांबळी यांच्या उपस्थितीत माहेरची साडी आणि जमलेल्या स्त्रियांमधून भाग्यवान विजेतीची निवड करत मानाची साडी देऊन स्त्रियांचा सन्मान करण्यात आला. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात अशा उपक्रमांमुळे आनंदाचे क्षण निर्माण होतात अशा भावना उपस्थित स्त्रियांनी यावेळी व्यक्त केल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

…म्हणून विजयादशमीला आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात

News Desk

बहिणाबाईंचे अनमोल काव्य

News Desk

‘ती’ने परिस्थितीवर मात करत, जगासमोर ठेवला नवा आदर्श

News Desk
राजकारण

राहुल गांधींनी देशाची माफी मागावी | दाणवे

News Desk

मुंबई | न्यायमुर्ती लोया यांच्या मृत्यूचे राजकारण करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी जनतेची माफी मागावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा अजेंडा काँग्रेस पक्षाला रोखता येत नसल्यामुळे राहुल गांधीसह त्यांचे सहकारी विकासाच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष हटवत असल्याचा आरोप दाणवे यांनी केला. जनता अशा आरोपांना बळी पडणार नाही आणि भाजपही विकासाच्या मुद्द्यावरून दूर जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

राहुल गांधी यांनी लोया यांच्या मृत्यू प्रकरणी पत्रकार परिषद घेतली होती . तसेच राहुल गांधी यांनी दीडशे खासदारांसोबत राष्ट्रपतींकडे जाऊन संशयाचे वातावरण निर्माण केले होते. राहुल गांधींनी या विषयात घाणेरडे राजकारण केल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सिद्ध झाले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या बदनामीचे कारस्थान केल्याबद्दल आणि न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल राहुल यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, असे दानवे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

 

 

Related posts

आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राज्यातील यंत्रणांना निर्देश

Aprna

आता अण्णा हजारे उपोषण मागे घेणार ?

News Desk

निवडणूक येताच सेना-भाजप श्रीरामच्या भूमिकेत दिसतात !

Gauri Tilekar