HW News Marathi
राजकारण

मंत्रिमंडळाचा विस्तार दसऱ्यानंतर करा !

मुंबई । सरकारने मंत्रिमंडळाच्या विस्तारावर वाढविण्यावर सध्या चर्चा सुरू आहे. या मंत्रिमंडळात कोण कोणत्या मंत्र्यांची वर्णी लागणार याकडे सर्वाचे लक्ष लागेल आहे. या मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांच्या नावाची यादी मध्ये पाठविण्यात आली आहे. तर परंतु आरपीआय पक्षातून अविनाश महातेकर नाव पुढे येत आहे.

तर शिवसेनेकडून कोणतीही यादी तयार करण्यात आलेली नाही. परंतु त्यात कोणाची निवड करायची हा पेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार दसऱ्यानंतर करावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी एक किंवा दोन जणांच्या नावाचा समावेश होणार आहे.

शिवसेनेमध्ये नाराजीचा सुर

शिवसेनेच्या काही विद्यमान मंत्र्यांविरोधात शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. विधानसभा निवडणुका जिंकणार्‍या आमदारांना मंत्रीपद देण्याऐवजी विधानपरिषदेवर असलेल्या नेत्यांना कॅबीनेट मंत्रीपदे देण्यात आल्याने शिवसेनेत खदखद आहे. या मंत्र्यांच्या कामाविषयी आमदारांनी उध्दव ठाकरे यांच्याकडे नाराजीही बोलून दाखविली आहे. मात्र, शिवसेनेच्या या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रीपदावरुन हटविणे कठीण आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सरकार बोलण्यात ऑनलाईन,कामात ऑफलाईन!: खा. अशोक चव्हाण

swarit

शेतकरी प्रश्नावरुन भाजपा सरकारवर ठाकरेंचे टीकास्त्र

News Desk

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विधिमंडळाचे कामकाज तहकूब

News Desk
देश / विदेश

अमृतसरमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान अपघात

News Desk

अमृतसर | पंजाबमधील अमृतसरमध्ये रावण दहनादरम्यान मोठा अपघात घडला आहे. अमृतसर येथे रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या लोकांना रेल्वेने धडक दिल्याची घटना घडली आहे. सदर अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथे आयोजित रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी अनेकजण रेल्वे रुळांवर उभे होते. त्यांना रुळावरून भरधाव वेगात येणाऱ्या रेल्वेची धडक बसल्याने हा अपघात झाला आहे.

Related posts

“पप्पू कभी पास नहीं होगा”, नितेश राणेंचा राहुल गांधींना टोला

Darrell Miranda

डीएसकेंना 22 फेब्रुवारीपर्यंत दिलासा

Adil

भारतीय सीमेवरील पाकिस्तानचा हल्ला लष्कराने हाणून पाडला

News Desk