HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई उत्तर भारतीय लोकच चालवतात। संजय निरुपम

नागपूर । “उत्तर भारतीय समाजच मुंबई चालवतो. उत्तर भारतीयांनी काम करण्याचे बंद केल्यास मुंबई- महाराष्ट्र बंद पडेल,” असे वादग्रस्त विधान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी केले आहे. काल नागपूरमध्ये झालेल्या उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत संजय निरुपम बोलत होते. संजय निरुपम हे वारंवार अशी वादग्रस्त वक्तव्ये करीत असतात. त्यांच्या या आणखी एका वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांनी स्वतः वर वाद ओढवून घेतला आहे.

“उत्तर भारतीय कोणत्याच कामात मागे नाहीत. सगळ्या क्षेत्रात ते सक्रिय आहेत. उत्तर भारतीय लोक टॅक्सी-रिक्षा चालवण्यापासून दूध विकण्यापर्यंतची सगळी काम ते करतात. फळ, भाजी, वर्तमानपत्र विकणे अशी सर्वच कामे उत्तर भारतीयच समाज करतो. मुंबईकरांचा भार उत्तर भारतीय त्यांच्या खांद्यावर घेऊन चालत असतो. बांधकाम क्षेत्रातसुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीयच असतात. जर कधी उत्तर भारतीयांनी ठरवले की काम करायचे नाही. तर मुंबई आणि महाराष्ट्र ठप्प पडेल. मुंबईकरांना जेवायला सुद्धा मिळणार नाही. आम्ही असे काही करणार नाही पण आम्हाला हे सगळे करण्यास भाग पाडू नका,” असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.

“पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्येच एवढे घडत असताना मोदी मात्र यावर काहीही बोलत नसून त्यांनी हे लक्षात घ्यावे कि त्यांनाही वाराणसीला जायचे आहे,” अशी धमकीच निरुपम यांनी मोदींना दिली आहे. गुजरातमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर उत्तर भारतीयांवर गुजरातमध्ये हल्ले होत आहेत. एका उत्तर भारतीयाने चूक केल्यामुळे तुम्ही सगळ्या उत्तर भारतीयांना दोषी ठरू शकत नाही, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्राचं नेतृत्व एका चांगल्या हातात आहे, ग्रामपंचायत निवडणुकीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

News Desk

12 विधानपरिषद सदस्यांच्या यादीच्या उपलब्धता बाबत राजभवन सचिवालय उद्या फैसला करणार!

News Desk

मनसेचे मुंबई, पुण्यातील २ मेळावे अचानक रद्द; कारण काय?

News Desk