HW News Marathi
देश / विदेश

जेट एअरवेजच्या विमानाची पुन्हा एकदा इमर्जन्सी लँडींग

नवी दिल्ली | जेट एअरवेजच्या विमानांमध्ये बिघाड होण्याच्या घटनेत दिसेंदिवस वाढच होत आहेत. हैदराबाद-चंदीगढ विमानाची आज (रविवार ३० सप्टेंबर)ला जळपास ३६ हजार फुटांवर विमानाचे इंजिन बंद पडल्याने इंदोर विमानतळावर इमर्जन्सी लॅडींग करण्यात आली.

 

आठवड्या भरापुर्वी मुंबई-जयपूर विमानामधील प्रवाशांना नाका आणि कानातून रक्त येण्याचा त्रास सुरू झाल्याने जेट एअरवेजचे ते विमान पुन्हा मुंबईला आण्यात आले होते. जेट एअरवेच्या आज सकाळी १०.४८ मिनिटांचे विमान ९६ प्रवाशांना घेऊन हैदराबाद विमानतळावरून उड्डाण घेतले होते. परंतु ३६ हजार फूट म्हणजेच ११ किमी उंचीवर असताना इंजिनामध्ये बिघाड झाल्याचे कळाले. यानंतर विमान ८५० किमी प्रति मैल वेगात होते. त्यामुळे विमानाला तातडीने इंदोर विमानतळावर उतरविण्यात आले. सध्या या विमानाची दुरुस्तीचे काम सुरू आहे.

जेट एअरवेजची ही १० दिवसांतील तिसरी घटना आहे.शुक्रवारी सायंकाळी मुंबईहून उड्डाण घेलेले विमान औरंगाबादला जात होते. यावेळी विमानात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत खासदार प्रीतम मुंडेसोबत अन्य पदाधिकारी होते. त्यावेळी देखील विमानात अचानक इमर्जन्सी लँडींग करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जाणून घ्या… देशभरातील कोणकोणत्या राज्यात किती रुग्ण ‘कोरोना’मुक्त

swarit

ठरल्याप्रमाणे नितीश पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान

News Desk

#AeroIndia2019 : ‘एरोइंडिया’च्या शो दरम्यान कार पार्किंगला भीषण आग

News Desk
मुंबई

रिपब्लिकन पक्षाचा ६१ वा वर्धापनदिन सोहळा

News Desk

मुंबई | महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा ६१ वा वर्धापन दिन सोहळा येत्या ३ ऑक्टोबरला ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड मैदानात आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी मोठया संख्यने उपस्थिती राहून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकारांच्या संकल्पनेतील व्यापक रिपब्लिकन पक्ष उभरण्याचा संकल्प करा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष ३ ऑक्टोबर १९५७ रोजी स्थापन करण्यात आला. तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पक्षाविरुद्ध देशातील प्रबळ व्यापक विरोधी पक्ष म्हणून सर्व समावेशक रिपब्लिकन पक्ष उभारण्याची महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती. त्यानुसार सर्व जाती धर्मीयांचा पक्ष म्हणून सर्वसमावेशक रिपब्लिकन पक्ष साकारण्याचा आमचा प्रयत्न असून त्यामुळेच दरवर्षी आपण रिपब्लिकन पक्षाचा स्थपना दिवस आपण साजरा करतो.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले असून प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाण्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर मीनाक्षी शिंदे, खासदार कपिल पाटील, खा.राजन विचारे, आमदार संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, आ. प्रताप सरनाईक, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रामभाऊ तायडे असतील, अशी माहिती रिपाइं तर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे .

Related posts

मुंबईत दुस-या दिवशीही जोरदार पाऊस

News Desk

पावसामुळे महाविद्यालयीन परीक्षा पुढे ढकलल्या; विनोद तावडेंची माहिती

swarit

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई

News Desk