HW News Marathi
राजकारण

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी सहमत नाही | रामदास आठवले

मुंबई | अनुसूचित जाती जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज जो निर्णय दिला त्यावर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी असहमती दर्शवली आहे.अनुसूचित जातीजमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारांना देण्याचा निर्णय योग्य नसल्याचे सांगत सर्वच राज्यांची सरकारे अनुसूचित जाती जमातींना पदोन्नती मध्ये आरक्षण देणारा निर्णय घेतील असे नाही त्यामुळे संविधानाने दिलेला आरक्षणाचा अधिकार अनुसूचित जाती जमातींना आणि मागासवर्गीयांना मिळाला पाहिजे यासाठी संसदेत कायदा करण्याचा निर्धार रामदास आठवले यांनी केला आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( एन डी ए ) च्या घटक पक्षांच्या बैठकीत अनुसूचित जाती जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्यासाठी संसदेत कायदा करावा ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आपण मांडली आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची लवकरच भेट घेऊन संसदेत अनुसूचित जातीजमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करणारा कायदा आगामी अधिवेशनात मंजूर करावा अशी मागणी करणार असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

अनुसूचित जातीजमातींना पदोन्नती मध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून याबाबत अनुसूचित जातीजमातींवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार अनुसूचित जाती जमतींच्या हिताचे निर्णय घेत असून पदोन्नतीमध्ये आरक्षणाबाबत अनुसूचित जातीजमातींवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही.असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला .

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

माझा भीमा-कोरेगाव, एल्गार परिषदेशी काहीही संबंध नव्हता | तेलतुंबडे

News Desk

#Vidhansabha2019 | येत्या ८ तारखेला दसरा मेळाव्यात सर्व काही बोलेन !

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर

News Desk
मुंबई

पश्चिम किनारपट्टीवर बुलबुलची परिक्रमा

News Desk

मुंबई | वेस्टर्न नेव्हल कमांडच्या सुवर्ण महोत्सवाची आठवण करण्यासाठी भारतीय नौसेने मार्फत पोरबंदर येथून ‘बुलबुल’ या नौकायन जहाजावरील (आयएनएसव्ही) नौकायन मोहिमेला 26 सप्टेंबर 18 रोजी फ्लॅग ऑफिसर कमांडिंग गुजरात नेव्हल एरियाचे रियर एडमिरल संजय रॉय यांनी ध्वजांकित केले. पोरबंदर ते मुंबई असा पहिला टप्पा नियोजित करण्यात आला आहे.

‘बुलबुल’ गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमधील पश्चिम किनारपट्टीवर परिक्रमा करेल. आणि यातील मुंबई, गोवा आणि करवार बंदरांवर थांबेल आणि मग मंगळ बंदर मार्गावर थांबेल. अशा प्रकारे बुलबुल परिक्रमा करणार आहे.

आयएनएसव्ही बुलबुलला कॅप्टन विपुल मेहेरीशी यांनी नियोजित केले आहे. कॅप्टन विपुल मेहेरीशी हे आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचे प्रशंसनीय यॉट्समॅन आहेत. बुलबुलच्या पहिल्या टप्प्यात चालक दल के. के. आर. बिनॉय, लेफ्टिनेंट सीडीआर संजय सत्यपाल, लेफ्टिनेंट यामिनी दलाल, लेफ्टिनेंट कुमार प्रसेनजीत आणि एसएलटी लिखिता यांचा समावेश आहे.

Related posts

शिर्केने उभारली अनधिकृत इमारत म्हाडाने अदा केले 19 कोटी

News Desk

वातानुकूलित लोकल पास ३ आणि ६ महिन्यांचा काढता येणार

News Desk

उल्हासनगरातील शौचालयचा दुरावस्थेचा ठपका

News Desk