HW News Marathi
महाराष्ट्र

किल्लारीतील २२ हजार भूकंपग्रस्त नोकरीच्या शोधात

लातूर | भूकंपग्रस्त भागातील तरुणांना शासकीय नोकऱ्यांमध्ये २ टक्के समांतर आरक्षण लागू केले असले तरी प्रत्यक्षात २५ वर्षांत केवळ २ हजार ७७५ तरुणांनाच नोकऱ्या मिळाल्या आहेत. आजही तब्बल २० ते २२ हजार उच्चशिक्षित तरुण नोकरीच्या शोधात आहेत. ३० सप्टेंबर १९९३च्या पहाटे झालेल्या भूकंपात उस्मानाबाद जिल्ह्यातील २७ आणि लातूर जिल्ह्यातील २५ गावे उद्ध्वस्त झाली. भूकंपग्रस्त म्हणून २६ हजार नागरिकांना प्रमाणपत्र मिळाले. कोल्हापूर, नगर, पुणे जिल्हा परिषदांमध्ये अनेकांना भूकंपग्रस्त प्रमाणपत्रावर शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. पाचशे ते सहाशे तरुण पोलीस झाले आहेत. शंभरावर तलाठी आहेत.

समांतर आरक्षणासाठी स्थापित झालेल्या कृती समितीने २००५ पासून २००९ पर्यंत याप्रश्नी चिकाटीने लढा दिला. तरीही समांतर आरक्षणाची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली नाही. १७ नोव्हेंबर १९९४ चा अनुशेष भूकंपग्रस्तांमधून भरावा, अशी मागणी आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या मदत व पुनर्वसन खाते लातूरच्या पालकमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे या प्रस्तावाचा विचार होईल, अशी आशा भूकंपग्रस्तांमधून व्यक्त केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या

News Desk

सिंगापूरमधील आरोग्य परिषदेत सहभागी होणार! – राजेश टोपे

News Desk

४ खासदार निवडून येतात त्यांना लोकनेता म्हणता, मग ३०३ खासदर निवडून देणाऱ्या मोदींना काय म्हणायचं? पडळकरांचा सवाल

News Desk