HW News Marathi
देश / विदेश

मुंबईत पेट्रोल ९ पैशांनी महागले, सामान्यांचे हाल

नवी दिल्ली | मुंबईत आज (शुक्रवारी) पुन्हा पेट्रोल ९ पैसे प्रति लिटर एवढे महाग झाले आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. मुंबईत आजची पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ८९.६९ तर डिझेलची किंमत ७८.४२ एवढी झाली आहे. देशातील इंधन दरवाढीला लगाम बसण्याची कोणतीही शक्यता सध्या तरी दिसत नाही. याबाबतीत अद्याप सरकारकडून विशेष लक्ष किंवा ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत.

राजधानी दिल्लीतदेखील पेट्रोल १० पैशांनी महागले आहेत. इंधन दरवाढीमुळे देशातील सर्वसामान्य जनता पिळवटून निघालेली असताना प्रशासनाला मात्र याची कोणतीही पर्वा नसल्याचेच चित्र दिसत आहे. आधीच देशातील बऱ्याच राज्यात इंधनाच्या किंमतींनी नव्वदी पार केलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचे अवमूल्यन होत असल्याने तसेच कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडल्याने देशातील इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली, हीच कारणे वारंवार सरकारकडून देण्यात येत आहेत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी १० सप्टेंबर रोजी मोदी सरकारच्या कार्यकाळात सतत वाढणाऱ्या महागाईच्या विरोधात ‘भारत बंद’ची हाक दिली होती. या आंदोलनात २१ राजकीय पक्षांनी समर्थन आणि सहभाग घेतला होता

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महानायक अमिताभ बच्चन यांचे ट्विटर हँडल हॅक, प्रोफाईलला पाकच्या पंतप्रधानांचा फोटो

News Desk

शरद पवार सुधारणांच्या बाजूने, राजकारणासाठी काहींचा यूटर्न, मोदींचा थेट पवारांना टोला

News Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर; मोदी-शहांची भेट घेणार ?

Aprna
मुंबई

खासदार संजय राऊत यांच्यावर बेळगावमध्ये गुन्हा दाखल

News Desk

बेळगाव | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. निवडणुक आचारसहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा खासदार संजय राऊत यांच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. दोन भाषींकामध्ये तेढ निर्माण करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

काश्मीर, कावेरी, सतलज आणि बेळगावचा विषय लोकशाही मार्गाने सुटला नाही तर आम्ही ठोकशाहीने प्रश्न सोडवू, अशी आक्रमक भाषा राऊत यांनी शुक्रवारी केली होती.बेळगाव चा प्रश्न लोकशाहीच्या मार्गाने सुटत नसेल तर, आम्ही ठोकशाहीच्या मार्गाने हा प्रश्न सोडवू, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (29 मार्च) दिला होता. बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग आहे.

दोन्ही भागांचा इतिहास आणि संस्कृती एकसारखीच आहे. न्यायालय सीमाभागाबाबत कधी निर्णय घेईल, तो घेवो. मात्र, तोपर्यंत बेळगाव हा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा, असे राऊत यांनी म्हटले.

Related posts

रेल्वे अंगावरून जाऊनही जिवंत | सीसीटिव्हीत कैद

News Desk

मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर झाड पडले

News Desk

Dahi Handi |गोविंदा पथक करणार शहीद सैनिकांच्या कुटुंबाला मदत

News Desk