HW News Marathi
महाराष्ट्र

गणेशोत्सवा दरम्यान चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाकडून विशेष भेट

मुंबई । दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबईहून मोठ्या संख्येने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यासाठी एसटी महामंडळाकडून या ही वर्षी एक विशेष भेट देण्यात येणार आहे. यावर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने एसटी महामंडळाने दोन हजार २२५ जादा बससेवांची घोषणा केली आहे.

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी एसटीकडून ८ ते १० सप्टेंबर या काळात नेहमीच्या गाड्यांव्यतिरिक्त जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गणेशोत्सवा दरम्यान कोकणात जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांची तिकिटे आधीच फुल झालेली असतात.

एसटी महामंडळ दरवर्षी प्रवाशांसाठी जादा बसची ही सुविधा पुरवितात. एसटी महामंडळाने चिपळूण, मालवण, गुहागर, दापोली, देवरुख, खेड, रत्नागिरी, सावंतवाडी, महाड यामार्गावर जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे.

पुण्यातूनही सोडण्यात येतील जादा गाड्या

पुण्यातील स्वारगेट, पिंपरी-चिंचवड, पुणे स्टेशन या बस स्थानकांवरून जादा गाड्या सोडण्यात येणार असून, त्यासाठी आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जास्त लोकांना विशेष सेवा

एकाच ठिकाणाहून कोकणात जाणाऱ्या 40 नागरिकांनी एकत्र मागणी केल्यास त्यांना संबंधित ठिकाणाहून जादा बस सोडण्याची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘मुंबई कोस्टल रोडमध्ये १ हजार ६०० कोटींचा भ्रष्टाचार’ – आशिष शेलार

News Desk

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची सायबर कमिटी

News Desk

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन 

News Desk
मुंबई

ड्रायव्हिंग लायसन्स आता कॉलेजातच मिळणार!

News Desk

पुणे : वाहन परवाना काढण्यासाठी आरटीओमध्ये रांगा लावणे किंवा एजंटचे पाया धरावे लागणे, आता थांबणार आहे. शिकाऊ वाहन परवाना (र्निं लायसन्स) देण्याचेअधिकार सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्राचार्याना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुंबईत नुकत्याचझालेल्या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिवांनीयाबाबतचे आदेश दिले असून, ३१ ऑगस्टला याबाबतचे प्रारूप नियम प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यामुळे महाविद्यालयीन काळातच विद्यार्थ्यांना विनाकटकट वाहनपरवाने काढून घेता येणार आहेत.

शिकाऊ वाहन परवान्यासाठी सध्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतात. चाचणी देण्याच्या तारखेला आरटीओ कार्यालयात जावे लागते. त्या ठिकाणीवाहन निरीक्षकांकडून अर्जदाराची चाचणी घेण्यात येते. मुख्य सचिवांनी दिलेल्या आदेशानुसार हे अधिकार प्राचार्याना देण्यात येणार असून, त्यासाठी नियमांत सुधारणाहीकरण्यात येणार आहे. ३१ ऑगस्टला त्याचे प्रारूप प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील एक महिन्यात त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयामुळे प्राचार्यावरशैक्षणिक कामाशिवाय एका वेगळ्याच कामाची जबाबदारी येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाहन नोंदणी वितरकांकडेच

प्रवासी आणि मालवाहू वाहने वगळता दुचाकी आणि चारचाकी हलक्या मोटारी आदी वाहनांच्या नोंदणीचे काम आरटीओऐवजी संबंधित

वाहन वितरकांकडेच सोपविण्याचानिर्णयही घेण्यात आला आहे. त्यासाठी वाहन वितरकांना नोंदणी प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

Related posts

नीट परीक्षेसाठी लढा देणाऱ्या तरूणची आत्महत्या

News Desk

कल्याण डोंबिवलीत धावणार महिलांसाठी तेजस्विनी बस

News Desk

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत स्फोट

News Desk