HW News Marathi
देश / विदेश

शेतक-यांचे दिल्लीत आंदोलन

नवी दिल्ली । कर्जमाफी, महागाई, किमान भत्ता अशा विविध मागण्यांसाठी देशातील शेतकरी आणि मजूर रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. हे आंदोलन दिल्लीच्या रामलीला मैदानातून सुरू झाले असून संसदच्या मार्गांपर्यंत येवून पोहचली आहे. या आंदोलनात मुसळधार पावसामुळे फटका बसलेल्या केरळ राज्यातील शेतक-यांचा देखील सहभागी झाले आहे. निवडणुका येतात आणि जातात. परंतु सरकारचे शेतक-यांच्या धोरणात बदल होत नसल्याच्या भावना शेतक-यांनी व्यक्त केल्या आहेत.

शेतक-यांच्या आंदोलनामुळे दिल्लीकरांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या आंदोलनामुळे दिल्लीच्या वाहतुक पोलिसांनी काही रस्त्यांवरुन प्रवास न करण्यांच्या सूचना दिल्या आहेत. ऑल इंडिया किसान महासभेकडून या आंदोलनाचे नेतृत्त्व केले जात आहे. तसेच या आंदोलनात डाव्या संघटनांनी देखील या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

मजूरांना प्रति महिना किमान १८ हजार रुपये भत्ता, तरणांना रोजगाल, खाद्य वितरण व्षवस्थेत सुधारणा, मजूर कायद्यात बदल, स्वामीनाथन आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी या आंदोलनात सहभागी झालेल्या मजूरांच्या मागण्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळे करावे लागेल !

News Desk

माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत नाही !

News Desk

काँग्रेसच्याच पुण्याईवर देश चालतोय, मोदी सरकारला आत्मचिंतनाची गरज, संजय राऊतांचा घणाघात

News Desk