HW News Marathi
महाराष्ट्र

तरुणांना संमोहित करून कट्टरवादी बनविण्याचा सनातनचा कट – सीबीआय

औरंगाबाद | सोशल मीडियावरील तरुणांना संमोहित करून कट्टरवादी बनविण्याचा सनातनचा कट असल्याची माहिती सीबीआयकडून मिळत आहे. तरुणांना संमोहित करणाऱ्या ह्या कटाच्या सूत्रधाराचा शोध सुरु असल्याची माहिती मिळत आहे. डॉ. दाभोळकर, गौरी लंकेश यांच्या हत्येशी असणारा सनातनच्या मंडळींचा संबंध याबाबत सीबीआयकडून हा तपास सुरु आहे.

डॉ. दाभोळकर आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी सनातन संस्थेशी संबंधित शरद कळसकर, सचिन अंदुरे, श्रीकांत पांगरकर, रोहित रेगे, नचिकेत इंगळे, अजिंक्य सुरळे या सहा जणांना सीबीआय आणि एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या सर्वांची संभाषणे, सोशल मीडिया अकाउंट्स याचा अभ्यास आणि माहिती सीबीआय मिळवत आहे. या तपासात सनातनच्या मंडळींचे सचिन अंदुरेबरोबर मोबाइलऐवजी लँडलाइनवरून संपर्क केल्याचे समजते. सचिनला संमोहित करून या गुन्ह्यात ओढल्याचे सीबीआयच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

वरील सहा जणांचा संबंध जसा दाभोळकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्येशी आहे तसाच तो कॉ. पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येशी देखील असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवभोजन थाळीच्या शर्यतीत आता दीनदयाळ थाळी

swarit

पाणी टंचाई असेल तेथे तातडीने पिण्याच्या पाण्याचे टॅंकर द्या! – बाळासाहेब थोरात

Aprna

राज्यातील गरीब, कष्टकरी जनतेला अन्नधान्याचा व्यवस्थित पुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

swarit
देश / विदेश

इंडोनेशियात आता ज्वालामुखीचा उद्रेक

Gauri Tilekar

जाकार्ता | भूकंप आणि त्‍सुनामीनंतर झालेल्या प्रचंड हानीनंतर आता इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. इंडोनेशियातील उत्तर सुलावेसीमधील माऊंट सोपुतन या ज्वालामुखीचा आज (बुधवारी) उद्रेक झाला आहे. इंडोनेशियात एका पाठोपाठ एक येणाऱ्या या नैसर्गिक आपत्तींमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. इंडोनेशियात शुक्रवारी (२८ सप्टेंबर) ७.५ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले आणि त्यानंतर काहीच वेळात आलेल्या २ मीटर उंचीच्या त्सुनामीमुळे आधीच या देशात प्रचंड जीवितहानी झाली आहे.

प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमधून या ज्वालामुखीच्या राखेचे लोट ४ हजार मीटर उंच पसरल्याचे निदर्शनास येत आहे. इंडोनेशिया आधीच्या नैसर्गिक आपत्तींमधून अद्याप पूर्णपणे बाहेर पडलेला नसतानाच आता उत्तर सुलावेसीमधील माऊंट सोपुतन ज्वालामुखीने देशाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे त्सुनामी आणि भूकंप पीडितांसाठी सुरु असलेल्या बचावकार्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत.

इंडोनेशियातील आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. इंडोनेशियातील माऊंट सोपुतनच्या उत्तर पश्चिम भागात ज्वालामुखीमधून उठलेली राख आजूबाजूच्या प्रदेशातही पसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्यातरी या ज्वालामुखीतून येणाऱ्या राखेमुळे देश आणि परदेशातील विमानसेवेवर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नसल्याची माहिती बीएनपीडी या संस्थेने दिली आहे.

इंडोनेशियात ५ ऑगस्‍टच्या भूकंपात ४६० लोक मृत्युमुखी पडले होते. तसेच यापूर्वी २००४ मध्ये इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर विनाशकारी भूकंप आणि त्‍सुनामी आली होती. या आपत्तीमुळे हिंदी महासागर प्रभावित झाला होता. भारताच्या तामिळनाडू किनारपट्टी भागातही या प्रलयाने हाहाकार उडाला होता.

Related posts

१०१ वर्षाच्या वयोवृद्ध कोरोनावर मात करुन सुखरुप घरी गेले

swarit

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

News Desk

एअर इंडियाच्या विमानातील क्रू मेंबर्सना ‘जय हिंद’ बोलणे बंधनकारक

News Desk