HW News Marathi
देश / विदेश

कोफी अन्नान यांचे निधन

जेनेवा | संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन झाले आहे. १९६२ ते १९७४ आणि १९७४ ते २००६ इतका प्रदीर्घ काळ ते संयुक्त राष्ट्रात कार्यरत होते. ८ एप्रिल १९३८ रोजी त्यांचा जन्म झाला. गोल्ड कोस्ट म्हणजेच आत्ताचा घाना या देशात त्यांचा जन्म झाला.

१९९७ मध्ये कोफी अन्नान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटनांमध्ये ताळमेळ रहावा म्हणून संयुक्त राष्ट्र विकास समुहाची स्थापना केली होती. कोफी अन्नान यांना २००१ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. १९६२ मध्ये कोफी अन्नान यांनी WHO या संस्थेत बजेट अधिकारी म्हणून काम सुरु केले. तिथे ते ३ वर्षे कार्यरत होते.

१९६५ ते १९७२ या कालावधीत त्यांनी इथियोपियाची राजधानी असलेल्या अद्दीस अबाबा येथे संयुक्त राष्ट्रांच्या इकॉनॉमिक कमिशन फॉर अफ्रिकेसाठी काम केले. कोफी अन्नान यांनी जागतिक स्तरावर शांतता कशी प्रस्थापित होईल यावर लक्ष केंद्रीत केले आणि त्यासाठी आपले आयुष्य वेचले. तसेच गरीबीचे उच्चाटन कसे करता येईल, गरीब जनतेला समाजाच्या मुख्य प्रवाहात कसे आणता येईल यादृष्टीनेही समाजकार्य केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपची अधिकृत वेबसाईट हॅक, मोदींविरोधात अभद्र मजकूर

News Desk

देश व देशातील स्त्रीशक्ती क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ | अजित पवार

News Desk

गुजरात विधानसभा निवडणूकीच्या तारखा आज जाहीर होणार

News Desk
राजकारण

मोदी सरकारच्या इराद्याला कोर्टाच्या निर्णयामुळे चाप | अशोक चव्हाण

News Desk

मुंबई | आधारकार्ड आणि अनुसूचित जाती जमाती यांच्या पदोन्नती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिले. याच विषयाला अनुसरून काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या निर्णयाचे स्वागत करत ‘या निर्णयामुळे मोदी सरकारच्या हिरड्यांना चाप बसला’ असे सांगत मोदी सरकारवर घणाघात केला आहे.

अशोक चव्हाण म्हणाले , यूपीए सरकारचा आधार कार्ड वापराचा इरादा चांगला होता पण नंतर भाजपने व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणायचा प्रयत्न केला. आधार कार्ड सक्ती केली जात होती ती चुकीची होती. आता कोर्टाच्या आदेशाने तरी सर्वसामान्यांच्या अधिकारावर गदा येणार नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत ! मोदी सरकारच्या इराद्याला कोर्टाच्या निर्णयामुळं चाप बसला !

तसेच पदोन्नतीतील आरक्षणावर अशोक चव्हाण म्हणतात कि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारांना पदोन्नतील आरक्षणाबाबत निर्णय घेता येईल. तसेच विकेंद्रीकरण झाल्यामुळं इतर घटकांना न्याय देताना अडचण येणार नाही . कोर्टाच्या निर्णयाने एसएसटीला बढतीत आरक्षण देताना सरकारला अधिकार राहिल ही चांगली गोष्ट आहे.

Related posts

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्याचे मतदान

News Desk

“…त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही” जयंत पाटलांचा टोला

Aprna

‘ठग ऑफ महाराष्ट्र’ पोस्टरमधून विरोधकांकडून सरकारवर टीका

News Desk