HW News Marathi
मुंबई

स्वातंत्र्यदिनी मुंबईत ‘अल्ट्रा रन’

मुंबई । येत्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी ‘मुंबई अल्ट्रा -१२ तास रन’च्या पाचव्या पर्वामध्ये सुमारे पाचशे स्पर्धक आणि त्यांना उत्तेजन देण्यासाठी दोन हजार समर्थक धावणार आहेत. जे धावूच शकत नाहीत, त्यांनी किमान १२ मिनिटे तरी धावावे, यासाठी ‘वेलनेस ओव्हर इलनेस ’ हा संदेश यानिमित्ताने देण्यात येणार आहे. ऐंशी वर्षांचे डॉ. पी. एस्. रमाणी हे या ‘रन’चे ब्रॅण्ड अम्बेसेडर असून ते स्वत: १२ तास धावणार आहेत.

धावण्याच्या या कालावधीत धावपटूंना त्यांच्या गरजेनुसार खाण्यापिण्याची आणि काही काळ विश्रांती घेण्याची देखील मुभा राहणार आहे. १२ तासांचे हे अंतर ४२.२ किलोमीटरचे आहे. शिवाजी पार्क येथून पहाटे पाच वाजल्यापासून सुरू होणार्‍या या मॅरेथॉन रनचा सायंकाळी पाच वाजता समारोप अपेक्षित आहे. स्पर्धा पूर्ण करणार्‍या प्रत्येकाला पदक देण्यात येणार आहे. धावपटूंना आवश्यकता भासल्यास उपाचारासाठी धावण्याच्या मार्गांवर तज्ज्ञ डॉक्टर आणि १०८ रुग्णवाहिकाही असणार आहेत.

‘एडलवाइज ग्रुप’चे पाठबळ लाभलेल्या या स्पर्धेतील प्रवेश शुल्काचा निधी कर्करोगग्रस्तांवर उपचार करर्‍यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयाला देण्यात येणार असल्याचे ‘मुंबई अल्ट्रा -१२ तास रन’चे संचालक सॅविओ डिसोझा यांनी सांगितले. रेसच्या वैद्यकीय संचालिका गायत्री ठाकूर यांनी सांगितले की, धावण्याच्या वेळी एखाद्याला थकवा जाणवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना स्पर्धेतून माघार घेणे बंधनकारक राहील. यावेळी उषा सोनम यांनी धावण्याऐवजी चालत का होईना, पण स्पर्धा पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत

News Desk

मुंबईच्या उच्चभ्रु वस्तीत नपुंसकता वाढली

News Desk

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk
मुंबई

मुंबईमध्ये गणरायाच्या आगमनाला सुरुवात, कुर्ल्याच्या राजाचे जल्लोषात आगमन 

News Desk

मुंबई । मुंबई मध्ये गणरायाच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील मोठ्या जल्लोषात साजरा होणाऱ्या गणेशउत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. मुंबईतील पहिल्या मनाच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली असून, १२ ऑगस्ट रोजी बाप्पा माझा कुर्ल्याचा राजा हा मुंबईतील पहिला आगमन सोहळा चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दरबारातुन सुरुवात करण्यात आली. मुंबईतील प्रसिद्ध मूर्तिकार राहुल झुंजारराव यांच्या कल्पनेतून यंदाच्या कुर्ल्याच्या राजाचे सुंदर रूप साकारण्यात आले आहे.

आजपासून मुंबईतील गणरायाच्या आगमन सोहळ्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे उद्यापासून अनेक गणपती मंडळांचे आगमन सोहळ्याला सुरुवात होणार आहे. श्री गणेशाच्या स्वागताची आबलवृध्दांनी जंगी तयारी केली असून भक्तांनी गणरायाचे ढोल ताशांच्या गजरात, वाजत गाजत उत्साहात स्वागत केले. कुर्ल्याच्या आगमन सोहळ्याला भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

Related posts

…आता पुढील स्थानक प्रभादेवी

News Desk

कल्याण,कुर्ला व ठाणे मुंबईतील तीन अस्वच्छ रेल्वे स्थानक

News Desk

अंबरनाथमध्ये शाळेच्या फिवाढी विरोधात विद्यार्थ्यांसह मनसेचं उपोषण

News Desk