HW News Marathi
राजकारण

माहुलच्या भयग्रस्त रहिवाश्यांची केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली भेट

मुंबई | मुंबईच्या विविध भागांतील प्रकल्पग्रस्तांचे माहुल येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. नागरीसुविधांच्या अभावी प्रदूषित वातावरणात जगणाऱ्या येथील रहिवाश्यांचे जीवन धोक्यात आले आहे. येथील भारत पेट्रोलियम च्या प्रकल्पात नुकताच मोठा स्फोट झाल्याने या प्रकल्पग्रस्तांध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. माहुल च्या या भयग्रस्त राहिवासीयांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट घेऊन धीर दिला.

येथील भयग्रस्त राहिवाश्यांच्या अडचणी समस्या गाऱ्हाणी ऐकून घेऊन त्यांचे सुरक्षित योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले. प्रकल्पग्रत राहिवासीयांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन रामदास आठवलेंना यावेळी देण्यात आले. वसाहती समोरील भारत पेट्रोलियामला जर आग लागली तर येथून बाहेर पडण्यास येथील राहिवाश्यांना मार्गच नसल्याने हे रहिवासी भयभीत झाले असल्याचे राहिवाश्यांनी रामदास आठवलेंना सांगितले.

यावेळी रामदास आठवलेंनी प्रकल्पग्रस्तांच्या वसाहती समोरील भारत पेट्रोलियम प्रकल्पात झालेल्या स्फोटाच्या स्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे , महाराष्ट्र्र उपाध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे, चंद्रशेखर कांबळे, हसन शेख, सुमीत वजाळे, संजय डोळसे, हेमंत रणपिसे, रवी गायकवाड आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रजनीकांत यांचं राजकारण भगवं नसावं, | अभिनेता कमल हासन

Adil

“बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची दक्षता घ्या.” – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

Chetan Kirdat

#Elections2019 : तांत्रिक बिघाडाचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम

News Desk
राजकारण

भाजपातील दिग्गज मोदींवर भडकले, राष्ट्रमंचच्या कार्यक्रमात मोदीविरोधी सूर

News Desk

राष्ट्रमंचच्या वतीने शुक्रवारी मुंबईत लोकशाही बचाव, संविधान बचाव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं…यावेळी भाजपातील आजी माजी अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती…यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टिका केलीय…

Related posts

महान लढवय्यास आमची नतमस्तक होऊन मानवंदना!

News Desk

आजोबांचा अपमान झाला म्हणून सुजयने पक्ष सोडला !

News Desk

अखेर गोव्यात भाजपचे बहुमत सिद्ध

News Desk