HW News Marathi
राजकारण

भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य, आमदार आहुजा वादाच्या भौव-यात

नवी दिल्ली | भाजपातील वाचाळवीर नेते सर्वांनाच सुपरीचित आहेत. अनेकदा चुकीच्या वक्तव्यामुळे भाजपाच्या या वाचाळवीरांनी पक्ष अध्यक्ष अमित शहा यांच्यासह नरेंद्र मोदींना देखील अनेकदा अडचणीत आणले आहे. पुन्हा एकदा भआजपाचे आमदार ज्ञानदेव आहूजा यांनी विवादास्पद वक्तव्य केले आहे. जवाहरलाल नेहरु हे गोमांस खात होते, ते पंडित कसे होऊ शकतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

राजस्थानच्या रामगढचे भाजप आमदार ज्ञानदेव आहूजा म्हणाले, ”जवाहरलाल नेहरू पंडित नव्हते. ते गाई व वराहचे मांस खात होते. वराह मुसलमानांसाठी अपवित्र तर, गाई आमच्यासाठी पवित्र आहे. जो प्राण्यांना खातो तो कधीच पंडित होऊ शकत नाही. परंतु त्यांच्या मागे ब्राम्हण जोडले गेले.

आमदार ज्ञानदेव आहूजा यांनी यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य केले होते. जवाहर नेहरु विद्यापीठात (जेएनयु) विद्यार्थी किती बिअर पितात, मटन किती खातात, कंडोम किती वापरतात याची आकडेवारी त्यांनी दिली होती. या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हिंगोलीमध्ये भाजप-एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

News Desk

अमित शहांना स्वाईन फ्लू, उपचार सुरू

swarit

गडकरीच पंतप्रधान, ज्योतीषांनी वर्तविले भविष्य

News Desk
राजकारण

मध्य प्रदेशमध्ये सत्ता आल्यानंतर संघावर बंदी घालण्याचे काँग्रेसचे आश्वासन

News Desk

भोपाळ | मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील आश्वसनामुळे चांगलेच राजकारण तापलेले चित्र सध्या दिसत आहे. ” सत्ता आली तर शासकीय इमारती आणि परिसरात लावण्यात येणाऱ्या संघाच्या शाखांवर बंदी घालण्याचे”, आश्वासन काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात जनतेला दिले आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामुळे भापजने संतप्त व्यक्त केली आहे.

काँग्रेसने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी जाहीरनामा प्रसिद्ध केले आहे. यात हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने सौम्य हिंदुत्वाचा नारा देण्यात आला आहे. सत्तेत आल्यानंतर संघाच्या प्रभावाला आळा घालण्याचे वचन काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात दिले आहे. यात काँग्रेसने असे लिहिले आहे की, सरकारी कार्यालये आणि परिसरात आरएसएसच्या शाखा घेण्यावर बंदी घालण्यात येईल. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना शाखेमध्ये भाग घेण्याच्या आदेशालाही रद्द करण्यात येईल. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी उलटवार करत म्हटले की, ‘मंदिर नही बनने देंगे, शाखा नही लगने देंगे हेच’, सध्या काँग्रेसचे धोरण आहे.

 

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…दिंडोरी मतदार संघाबाबत

News Desk

“अच्छे दिनचे चित्र काय नागरिकांना जाणवले नाही”, शरद पवारांनी भाजपला टोला लगावला

Aprna

BharatBandh | भारत बंदला पुण्यात हिंसक वळण

News Desk