HW News Marathi
महाराष्ट्र

१५ ऑगस्टपासून मराठा समाजाचे ‘अन्नत्याग’ आंदोलन

मुंबई | मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी १५ ऑगस्टपासून ‘अन्नत्याग आंदोलन’ करणार करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. यापुढे मराठा समजा रस्त्यावर आंदोलन न करण्याची मोठी घोषणा मराठा क्रांती समितीने केली.९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. परंतु या बंदला हिंसक वळण लागले. त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती समितीने औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद बोलवली होती.

मराठा समाज आणि आंदोलनाला बदना करण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चा समितीने यावेळी केला. तसेच मराठा तरुणांवर जे गुन्हे दाखल केले आहेत. ते सर्व गुन्हे १५ ऑगस्टपर्यंत सरकारने मागे घ्यावे, असा इशारा देखील समितीने यावेळी दिला आहे.

वळूज एमआयडीसीतील ज्या कंपन्यांची तोडफोड झाली आहे. त्या कंपन्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी चेक करावे, आंदोलनात तोंड बांधून तोडफोड करण्यात आली. याआधी मराठा आंदोलकांनी तोडफोड केली नाही, मग आताच का असे झाले? तसेच या तोडफोडीची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली.

महाराष्ट्र बंदला हिंसक वळण

मराठा आंदोलकांनी निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली. पुण्यातील चांदणी चौकातही जमाव हिंसक झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार सुरू केला. चांदणी चौकातील परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. औरंगाबादमध्ये ही आंदोलकांनी २ खासगी वाहने पेटवली. पोलिसांनी आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आश्रूधुराचा वापर करून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

…तर फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय?; राष्ट्रवादीचा सवाल

News Desk

बेस्ट प्रशासनाचा डबल डेकर घोटाळा!

Aprna

राज्य सरकारसह अनिल देशमुखांना हायकोर्टाने दिला दणका; आव्हान याचिका फेटाळली

News Desk
क्राइम

सैन्यात भरती झालेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

News Desk

हिंगोली – सैन्यात भरती झालेल्या 19 वर्षीय तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. अमोल नामदेव पतंगे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. जिल्ह्यातील मौजे कामठा येथील ही घटना आहे.

कळमनुरीतालुक्यातील मौजे कामठा येथील रहिवासी असलेला तरुण अमोल नामदेव पतंगे (वय 19 वर्षे) हा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अहमदपूर येथील भरतीपूर्व सैन्य प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी गेला होता. नुकताच तो सैन्यात भरती झाला होता. सोमवारी (4 सप्टेंबर) त्याने औरंगाबाद येथे कागदपत्रं जमा केले व रात्री उशीरा घरी परतला. यानंतर दुस-या दिवशी सकाळी 8 वाजता त्यानं चुलतभावासोबत चहा घेतला. त्यानंतर घरात एकटाच टीव्ही पहात बसला.

आणि मग त्यानं घरात गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे.घरातल्यांची ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने अमोलला बाळापूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आत्महत्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी बाळापूर पोलीस पुढील तपास करीत असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related posts

जुहूमध्ये भाजपा आमदाराचे नाव घेऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

News Desk

सहा वर्षाच्या मुलीसोबत छेडछाड

News Desk

उत्पादन शुल्क विभागाने गावठी दारू भट्टीवर छापा, 16 जणांवर गुन्हा दाखल

News Desk