HW News Marathi
मुंबई

मेजर कौस्तुभ राणे शहीद, मीरारोडवर शोककळा

मुंबई | काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना ३ जवानांसह मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. मीरारोडचे रहिवासी असलेले कौस्तुभ राणे यांच्या हौतात्म्यामुळे शहर शोकसागरात बुडाले आहे.

सोमवारी रात्री काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये घुसखोर दहशतवाद्यांशी लढताना चार जवानांना वीरमरण आले होते. यात मीरारोडच्या शीतल नगर भागात राहणाऱ्या २९ वर्षांच्या मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांचाही समावेश आहे. मंगळवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच परिसरावर शोककळा पसरली. यानंतर राणे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली.

गुरुवारी सकाळी राणे यांचे पार्थिव त्यांच्या मीरा रोड येथील घरी आणले गेले आहे. सकाळी ९ पासून नागरिकांना अंत्यदर्शन घेता येणार आहे. सकाळी ११ च्या सुमारास अंत्ययात्रा निघणार असून, लष्करी इतमामात मीरा रोडच्या वैकुंठभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शांतता क्षेत्रात ध्वनीक्षेपक लावण्यास बंदी

News Desk

सर्व शिक्षा अभियान प्रवेश प्रक्रियेत बदल, गरजवंताना मिळणार न्याय

News Desk

भारताचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

swarit
राजकारण

आपल्या विधानानंतर अवघ्या २४ तासातच राहुल गांधींनी दिले हे स्पष्टीकरण

Gauri Tilekar

नवी दिल्ली | मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मुलगा कार्तिकेय चौहान याचे नाव पनामा पेपर्समध्ये असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले होते. मात्र आता राहुल गांधी यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले होते. मध्य प्रदेशातील पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले कि, “पनामा पेपर्समध्ये शिवराज सिंह यांच्या मुलाचे नाही तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या मुलाचे नाव आहे. शिवराज सिंह यांचे नाव तर व्यापमं घोटाळ्यात होते.”

आपल्या विधानानंतर २४ तासांच्या आत राहुल गांधी यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. मध्य प्रदेश दौऱ्यात बोलताना राहुल गांधी यांनी शिवराज सिंह चौहान आणि त्यांच्या मुलावर आरोप केले होते. त्यानंतर मध्यरात्री ट्विट करून आपण राहुल गांधी यांच्याविरोधात आज (मंगळवारी) अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे चौहान यांनी म्हटले होते.

त्याचप्रमाणे कार्तिकेय सिंह यांनी देखील ट्विट करून राहुल गांधींचे विधान खोटे असल्याचे म्हटले होते.“पनामा पेपर्समध्ये माझे नाव आल्याचे राहुल गांधी यांचे विधान खोटे आहे. सार्वजनिक व्यासपीठावरुन माझी आणि माझ्या कुटुंबीयांची प्रतिमा मलिन करण्यात आली आहे. यामुळे मी दुःखी आहे. ४८ तासांच्या आत जर राहुल यांनी माफी मागितली नाही तर याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करेन,” असे कार्तिकेय यांनी म्हटले होते.

राहुल गांधींचे विधान

“पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे नाव पनामा पेपर्समध्ये आल्यानंतर पाकिस्तानसारख्या देशानेही कारवाई करत त्यांना कारागृहात पाठवले. मात्र शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्समध्ये येऊनही त्यांच्याविरोधात कोणती कारवाई केली गेली नाही,” अशी टीका राहुल गांधींनी केली होती.

Related posts

ना दलित, ना मुसलमान ‘जाट’ आहेत हनुमान !

News Desk

राहुल गांधी इटलीत जा !

News Desk

पालघरच्या सभेत सविस्तर बोलेन | राज ठाकरे

News Desk