HW News Marathi
राजकारण

मंत्रालय परीसरात असलेल्या भाजप कार्यालयासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त

मुंबई | राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. ५८ मुक मुर्चे काढूनही न्याय न मिळाल्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात आंदोलकांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. परंतु या ठिय्या आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्यामुळे मंगळवारपासून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.

मंगळवारी पंढपूरचे वारकरी घरी परतत असल्यामुळे त्यांना त्रास होऊ नये म्हणून मुंबईसह काही भागात बंद पाळण्यात आला नव्हता. परंतु बुधवारी मुंबईसह महाराष्ट्रातल्या उर्वरीत भागात आंदोलकांनी बंदची हाक दिली आहे.

सदर आंदोलनाच्या दरम्यान एका आंदोकाने गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या जाळपोळ करण्यात आली आहे. त्यामुळे आज मुंबई बंदच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील नेत्यांना त्रास होऊ नये तसेच कार्यालयाची तोडफोड होऊ नये म्हणून मुंबईतील भाजप कार्यालय परीसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बुरखा घालणारी प्रत्येक महिला दहशतवादी नसते !

News Desk

प्रियांका गांधी यांची राजकारणात एन्ट्री

News Desk

येडं पेरलं अन् खुळं उगवलं, धनंजय मुंडेंची दानवेंवर जहरी टीका

News Desk