HW News Marathi
महाराष्ट्र

स्कायमेटच्या दाव्यानुसार गेल्या २४ तासात माथेरानमध्ये देशातील सर्वाधिक पाऊस

मुंबई | गेल्या ८ दिवसात मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर पहायला मिळत आहे. शहर आणि उपनगरातील पावसाच्या तुलनेत ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये मागील २४ तासांत झालेल्या पावसाची नोंद १७० मिलीमीटर इतकी झाली असून हा देशातील सर्वाधिक पाऊस आहे, असा दावा स्कायमेटने केला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान माथेरानमध्ये ११४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. दरम्यान, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याच्या तुलनेत मुंबई शहर आणि उपनगरातील पावसाचे प्रमाण कमी असून, सोमवारसह मंगळवारी मुंबई शहर,उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने मुंबईला रविवारी दिलेल्या इशाऱ्यानुसार येथे अतिवृष्टी झाली नसली, तरीदेखील प्रत्यक्षात मात्र मुंबई शहरासह उपनगरात दिवसभर कोसळलेल्या पावसाने मुंबईकरांना चांगलीच धडकी भरवली होती. विशेषत: मुंबई शहराच्या तुलनेत पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस कोसळत होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

…तरच मी तुम्हाला श्रेय देण्यास तयार, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना अल्टीमेटम

News Desk

शिवसेनेच्या डॉ. मनीषा कायंदे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी

News Desk

शेतकर्‍यांना खलीस्थान वादी म्हणणारे अमित शहा कोण लागून गेले?- राजू शेट्टी

News Desk
महाराष्ट्र

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा शुभारंभ

News Desk

मुंबई | आता महाराष्ट्रातील शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यातील शाळांची निवड करण्यात आली आहे. त्या शाळांमध्ये आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मंगळवारी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुंबईमध्ये झालेल्या कार्यक्रमात या १३ शाळांची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हे उपस्थित होते. निवड करण्यात आलेल्या या १३ शाळांना ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा’ असे संबोधण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अटलजींनी नेहमीच विविध क्षेत्रात सर्व पध्दतीने विकास करुन देशाला दिशा दिली, देशाच्या विकासाचा दर वाढविला. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतीयांना भारतातच आंतरराष्ट्रीय शिक्षण देण्याच्या या उपक्रमाचा शुभारंभ म्हणजेच अटलजींना खऱ्या अर्थाने ही श्रध्दांजली आहे.

राज्यातील मुलांना त्यांच्या मातृभाषेतूनच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, त्याचप्रमाणे त्यांना जगातल्या विविध भागाचे ज्ञान व्हावे या उद्देशाने राज्य शासनाकडून महाराष्ट्रातील १०० शाळांना आंतरराष्ट्रीय शाळांचा दर्जा देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पुणे, सातारा, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नंदुरबार, परभणी, चंद्रपूर, गोंदिया, बुलढाणा, वाशिम या १३ जिल्ह्यातील शाळांची निवड करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

या शाळांच्या निवडीसाठी विविध प्रकारचे निकष ठरविण्यात आले आहेत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय शाळांसाठी घटकांचा पुढाकार, शाळेतील विद्यार्थी पटसंख्या, मूलभूत पायाभूत सुविधा ज्यामध्ये शाळेची प्रवेश क्षमता, इंटरनेट सुविधा, स्वच्छ परिसर, तंत्रज्ञानाच्या वापरासाठीच्या सुविधा, विद्यार्थ्यांची वाहतूक सुविधा अशा अनेक निकषांच्या आधारे या शाळांची निवड करण्यात आली आहे.

Related posts

आजपासून राज्यातील नाट्यगृह खुली; अजित पवार म्हणाले, “किती वेळा वाजवायची…”

News Desk

मीरा NX हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थेटर प्रमुख महिला कर्मचारीचा संशयस्पद मृत्यू

News Desk

राज्यातील एकही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही! – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

Aprna