HW News Marathi
राजकारण

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 73 वा वर्धापन दिन साजरा

मुंबई | संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनाअपेक्षित सामाजिक समतेची क्रांती घडविण्याचा मार्ग शैक्षणिक क्रांतीतूनच होईल. त्यासाठी समाजात शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेऊन नोकरी केली नाही तर समाजाच्या उद्धारासाठी स्वतःला वाहून घेतले. जगातील सर्वश्रेष्ठ विद्वान महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर असल्याचा आम्हाला अभिमान असून त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केल्याने ही संस्था सामाजात झालेल्या शैक्षणिक प्रगतीचा ऐतिहासिक पाया ठरली आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयाच्या बुद्धभवन येथील सभागृहात आयोजित कर्यक्रमात रामदास आठवले अध्यक्ष म्हणून बोलत होते. रामदास आठवले हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेयरमन आहेत. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात अनेक विद्यार्थी घडले त्यात समाजसेवक, पत्रकार, डॉक्टर , क्रिकेटपटूही घडले. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात रामदास आठवले हे सुद्धा विद्यार्थी होते. आज ते केंद्रियराज्यमंत्री पदापर्यंत पोहोचले असून पीपल्स एज्युकेशन सोसायटी या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष असल्याबद्दल आम्हाला अभिमान असल्याचे यावेळी रिपाइं पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांनी आपले मत व्यक्त केले.

यावेळी पी ए सोसायटीचे अशोक तळवटकर, सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य जी. व्ही.राव, डॉ. जयमंगल धनराज, गौतम सोनवणे, बी के बर्वे, एड आशाताई लांडगे, चंद्रशेखर कांबळे, घनश्याम चिरणकर, सो ना कांबळे, प्रकाश कमलाकर जाधव , सचिन बनसोडे, सचिनभाई मोहिते, शिरीष चिखलकर, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#LokSabhaElections2019 : बी. जी. कोळसे पाटील वंचित बहुजन आघाडीतून बाहेर

News Desk

Chhattisgarh Assembly Elections 2018 : ७० टक्के जनतेने केले मतदान

News Desk

नवनिर्वाचित मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी घेतली अमित शाह यांची भेट

Chetan Kirdat
राजकारण

तासगाव नगरपालिकेसमोर भर पावसात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे उपोषण

News Desk

सांगली | तासगांव शहराममध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे नियम धाब्यावर बसवून नळाला चंबळ कंपनीचे मीटर बसवले आहेत. चंबळ कंपनीचे मीटर लावण्यात येऊ नयेत व पाणीपुरवठा विभागाची जॅकवेलचा ठेका पद्धत रद्ध करावी या मागणीसाठी मंगळवारी सकाळी ११ वाजल्या पासून राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक भर पावसात उपोषणाला बसले होते. तासगांव शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाअधिका-यांनी देखील या उपोषणाला यावेळी पाठिंबा दर्शविला.

काय आहे प्रकरण

तासगाव नगरपालिकेने चंबळ कंपनीचे पाणी मीटर खरेदी केले आहेत. खरेदी केलेल्या एकूण मीटरची संख्या दोन हजारच्या आसपास आहे. त्यात लाखोंचा भष्टाचार झाला आहे असा आरोप नगरसेवक बाळासाहेब सावंत व अभिजित माळी यांनी केला आहे. चंबळ कंपनीचे पाणी मीटर हे बोगस आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे नियम धाब्यावर बसवून मीटर बोगस खरेदी केले आहेत मुळात हे मीटर बाजारात ३९० रुपयाला येते मात्र नगरपालिकेने जनतेच्या नळाला १०४० ला रुपयाला बसवले आहे.

तासगाव शहरात एकुण १००६ मीटर बसवले आहेत. हे मीटर अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. हे मीटर पाणी येण्याअगोदर हवा येते हवा आली की मीटर फिरू लागतात तासगाव शहरात पाण्याच्या टाक्या तीन आहेत.भाजपाने सांगितले चोवीस तास पाणी देऊ पण पाणीही पुरेसे देऊ शकत नाहीत या मीटरमध्ये लाखोचा भष्टाचार झाला आहे. यात भाजपाचे नगराध्यक्ष, नगरसेवक व नगरपालिका कर्मचारी यांचा हात आहे असा आरोप नगरसेवक अभिजीत माळी व बाळासाहेब सावंत यांचा आहे.

जॅकवेलचा ठेकाही दिड कोट रुपायाला देण्यात आला आहे नगरपालिका सर्व ठेके देऊन कर्मचा-यांना नक्की काय काम लावणार आहे असा सवालही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला आहे. जॅकवेलच्या ठेक्यात ही लाखोचा घोटाळा झाला आहे या घोटाळय़ात कर्मचारी व नगरसेवकांचा हात आहे असा आरोप अभिजीत माळी व बाळासाहेब सावंत यांचा आहे

याची सखोल चौकशी व्हावी यासाठी एक दिवसाचे नगरपालिकेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नगरसेवक बाळासाहेब सावंत, अभिजित माळी, वैभव भाट, तानाजी पवार, नगरसेविका पद्मिनी जावळे, प्रतिभा लुगडे, निर्मला पाटील, सादिया शेख सहभागी होत्या. या उपोषणात शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अमोल काळे शहरप्रमुख संजयदाजी चव्हाण यानी पाठिंबा दिला. राष्ट्रवादीचे तालुकाअध्यक्ष हणमंतआप्पा देसाई,शहरअध्यक्ष अमोल शिंदे,युवकचे कमलेश तांबेकर,स्वप्निल जाधव,करण पवार,सचिन पाटील,परेश लुगड़े बशीर मोमिन महिला शहराध्यक्षा साळूंखे वहिनी, पूनम माळी उपस्थित होते.

Related posts

पंतप्रधान मोदी देशासाठी नव्हे तर निवडक उद्योजकांसाठी काम करतात !

News Desk

भाजपला बारामतीत विजय मिळाल्यास मी राजकारणातून निवृत्ती घेईन !

News Desk

ईशान्य मुंबईसाठी सोमय्यांऐवजी मनोज कोटक यांच्या नावाची चर्चा

News Desk