HW News Marathi
राजकारण

प्रकाश आंबेडकरांचा महत्वपूर्ण निर्णय

पुणे | भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 2019 च्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीसाठी वंचित बहुजनांची आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आघाडीच्या माध्यमातून आगामी निवडणुका लढवण्यात येणार आहेत. पुण्यात बुधवारी विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीला लक्ष्मण माने, हरिभाऊ बधे, विजय मोरे यांच्यासह विविध संघटनांचे उपस्थित होते.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराप्रमाणे लोकशाही सर्व स्तरापर्यंत पोहचली पाहिजे यासाठी ही आघाडी स्थापन करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्रभर दौरा केला जाणार आहे अशी माहिती बैठकीनंतर देण्यात आली. तसंच राज्यात चार ते पाच ठिकाणी परिषदा घेण्यात येतील असेही सांगण्यात आले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या निर्णयामुळे भाजप विरोधी महाआघाडी बनविण्याच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निर्णयाला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. आगामी काळात या आघाडीत कोण कोण सहभागी असणार आहे हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#LokSabhaElections2019 : सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळणार

News Desk

अरविंद सुब्रमण्यन यांचा राजीनामा

News Desk

राज्यपालांविरोधात आझाद मैदानावर करणार आंदोलन; उदयनराजेंची घोषणा

Aprna
राजकारण

माजी आमदार संदीप बजोरिया आयकर खात्याच्या रडारवर

News Desk

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संदीप बजोरिया यांच्याकडे मोठी रोकड सापडल्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले आहेत. बुधवारी विमानाने नागपूरहून मुंबईला येत असताना बाजोरिया यांच्याकडे तब्बल ४० लाख रूपयांची रोख रक्कम सापडली आहे. बजोरिया यांच्याकडे ४० लाख रुपये रोख सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बजोरिया यांच्याकडे असलेली ही रक्कम आली कुठून यावर बजोरिया कोणतेही स्पष्ट कारण देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे रोकड आयकर खात्याकडून जप्त करण्यात आली असून चौकशीनंतर बजोरियांना सोडण्यात आले आहे. मोठी रक्कम सापडल्याने माजी आमदार बजोरिया सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत.

चौकशी दरम्यान संबंधित रक्कम वरळी येथे घर विकत घेण्यासाठी आणल्याचा दावा बजोरीयांनी केला आहे. मात्र, आयकर विभागाने त्यांची कसून चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. आयकर खात्याने मात्र बजोरियांचा खुलासा फेटाळला आहे. बजोरिया सिंचन घोटाळा प्रकरणातले खासगी कंत्राटदार आहेत.

Related posts

जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारामुळेच दुष्काळाच्या झळा तीव्र !

News Desk

खिशात फाटलेले राजीनामे एकदा तरी द्या !

swarit

विधान परिषद निवडणुकीत खबरदारी म्हणून सर्व पक्षांचे आमदार पंचतारांकित हॉटेल मुक्कामी

Aprna