HW News Marathi
देश / विदेश

ऑडी डिव्हिजनचे सीईओ रुपर्ट स्टँडलर यांना अटक

नवी दिल्ली | फॉक्सव्हॅगन ग्रुपच्या ऑडी डिव्हिजनचे सीईओ रुपर्ट स्टँडलर यांना अटक करण्यात आली आहे. “स्टॅडलर यांना आज सकाळी अटक करण्यात आली असून, त्यांना ताब्यात ठेवायचे की नाही, यावर सुनावणी सुरु आहे.”, अशी माहिती ऑडीच्या प्रवक्त्यांनी दिली.

रुपर्ट स्टॅंडलर आणि सहआरोपींनी फसवणुकीसाठी बनावट कागदपत्र तयार केली, ज्यामुळे इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड असूनही गाड्या विक्री करण्यास परवानगी मिळाली. फॉक्सव्हॅगन, पोर्श आणि ऑडी यांसारख्या गाड्यांमध्ये इमिशन टेस्टिंग करणारे सॉफ्टवेअर आहे, मात्र या सॉफ्टवेअरमधून योग्य माहिती मिळत नाही. सप्टेंबर 2015 चे हे प्रकरण असून, या प्रकरणात 20 हून अधिक जण चौकशीच्या घेऱ्यात आहेत.

बीबीसीच्या वृत्तानुसार, ऑडी A6 आणि A7 मॉडेलच्या 60 हजार गाड्यांमध्ये प्रदूषण स्तर लपवण्यासाठी या सॉफ्टवेअरचा वापर केला गेल्याचं रुपर्ट स्टॅडलर यांनी मान्य केले. अमेरिका आणि इतर काही देशांनी 2009 साली गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणावरुन नियम अधिक कठोर केले होते. या नियमांना डावलल्यास कंपनीला दंड आकारला जातो. या दंडापासून वाचण्यासाठी ऑडी कंपनीने गाडीमध्ये अशा सॉफ्टवेअरचा वापर केला, ज्यामुळे प्रदूषणाच्या टेस्टिंगदरम्यान चुकीचे आकडे समोर येतात.

 

Related posts

2 हजारांच्या बनावट नोटांचीही पाकिस्तानात छपाई

News Desk

पंकजा मुंडे यांचे भोपाळ विमानतळावर जंगी स्वागत

News Desk

तीन वर्षाच्या मुलाची दहशतवादी हल्ल्यापासून केली सुटका

News Desk
देश / विदेश

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, ७ जणांचा मृत्यू तर २२ जखमी

News Desk

श्रीनगर | पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर गेल्या वारंवार हल्ला करण्यात येत आहे. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. २२ मे रोजी पाकिस्तानने कथुआ जिल्हामधील आरएसपुरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार बीएसएफच्या जवळपास ४० चौक्यांवर पाकिस्तानानने निशाणा साधला आहे. या हल्याला भारतीय लष्कराने मात्र चोख प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात आतापर्यंत सात नागरीकांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये हीरानगर सेक्टरमधील लोंदी गाव व अरनिया सेक्टरमधील नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून रात्री उशिरापर्यंत हीरानगर, सांबा, रामगड, अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू होता. वारंवार सुरू असलेल्या गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून पाच किलोमीटर परिसरातील सर्व शाळांना सुट्या देण्यात आल्या आहेत.

Related posts

सत्तेत असताना माझाही फोन टॅप झाला ही दुर्दैवाची गोष्ट !

swarit

लष्करातील महिलांना स्थायी कमिशन लागू 

swarit

मोदींमुळे देशात आर्थिक संकटाचे सावट

News Desk